शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 31, 2021 15:39 IST

तृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, कोरोनामध्येही महापाप केलं, स्मृती इराणींचा हल्लाबोल

ठळक मुद्देतृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, स्मृती इराणींचा हल्लाबोलतृणमूल काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड फेब्रुवारी पर्यंत रिकामी होणार, शुभेंदू अधिकारी यांचा इशारा

येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच भाजप आणि पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस यांनी आपली कंबर कसली आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. भाजपचे अनेक नेते पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. नुकताच अमित शाह यांचा नियोजित पश्चिम बंगालचा दौरा रद्द झाला. परंतु त्यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पश्चिम बंगालला पोहोचल्या. हावडामध्ये आयोजित एका रॅलीदरम्यान त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच काय तर त्यांनी बंगाली भाषेत आपलं भाषण केलं. तसंच ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामचा द्वेष असून या ठिकाणी रामराज्य स्थापन होणार असल्याचंही त्या म्हणाल्या. "यावेळी पश्चिम बंगालमध्ये रामराज्य स्थापित होणार आहे. दीदी यावेळी तृणमूल काँग्रेस सत्तेतून पायउतार होणार आहे आणि भाजप सत्तेत येणार आहे," असं स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांच्या रॅलीदरम्यान बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि बंगाल भाजप प्रमुख दिलीप घोष हेदेखील उपस्थित होते. "पहिल्यांदा कोणत्या नेत्यानं कट मनी स्वीकारलं. हे सरकार तांदूळ आणि डाळ चोर आहे. दीदींनी कोरोना महासाथीतही महापाप केलं आहे," असंही त्या म्हणाल्या. "जो पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठई केंद्र सरकारचा द्वेष करतो, जो आपल्याच लोकांना दूर करतो, जो जय श्रीरामच्या घोषणेचा अवमान करतो त्या पक्षाला कोणीही राष्ट्रभक्त ठरवू शकत नाही," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी शुभेंदू अधिकारी यांनीदेखील तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. "तृणमूल काँग्रेस ही आता लिमिटे़ड कंपनी झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत टीएमसी प्रायव्हेट लिमिटेड पूर्णपणे रिकामी होईल. त्यात कोणीच शिल्लक राहणार नाही," असं अधिकारी म्हणाले. अमित शाह यांचाही हल्लाबोलममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची वाटचाल अधोगतीकडे झाली. राज्याचा विकास करण्याचं सोडून ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगाल अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडलं, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणी