शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

रणनीती तयार, पाच जिल्हे, पाच नेते भाजपचे ‘टार्गेट’, सिद्धरामय्या, शेट्टर, सवदी, शिवकुमार, प्रियांक खरगे ‘रडार’वर

By श्रीनिवास नागे | Updated: May 8, 2023 05:36 IST

भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे.

श्रीनिवास नागे

कलबुर्गी : भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे. खुद्द अमित शाह या मिशनवर लक्ष ठेवून आहेत.

‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?

काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार यांना अस्मान दाखवण्यासाठी शहा यांनी व्यूहरचना केली आहे. मात्र, दोघेही महावस्ताद निघाले असून, त्यांनी राज्यभर भाजपविरोधात प्रचार तोफा धडधडत ठेवल्या आहेत. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची पाठ टेकवायचीच, त्याचबरोबर प्रियांक खरगेंना पाडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्का द्यायचा यासाठीही भाजपने ‘फिल्डिंग’ लावली आहे. सिद्धरामय्यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री सोमय्या यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या कनकपू मतदारसंघात त्यांच्याच वक्कलिग समाजाच्या आर. अशोक यांना उतरविले आहे.

चितापुरातून प्रियांक खर्गेंच्या विरोधात माणिकरत्न राठोड यांना, तर हुबळी-धारवाड मध्यमधून शेट्टर यांच्या विरोधात महेश टेंगिनकाई यांना लांग बांधली आहे. अथणीत सवदींविरोधात महेश कुमठळ्ळी यांना मोठी ताकद दिली जात आहे.

स्पेशल प्लॅन ‘फाईव्ह बी’

nविधानसभेच्या ७२ जागा असलेल्या पाच जिल्ह्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यात बेंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारीया ‘बी’ अद्याक्षराच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

n२०१८ मध्ये या जिल्ह्यांत भाजपला केवळ ३० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने ३७ जागा खेचल्या होत्या, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने पाच जागांवर विजय मिळविला होता.

२०१८ मध्ये लागली ठेच

२०२३ मध्ये जपून पावले राजधानी बंगळुरूमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील ३२ जागा आहेत. २०१८ मध्ये त्यापैकी केवळ ११ जागा भाजपला मिळाल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १०, तर बागलकोट मधील सातपैकी पाच जागांवर भाजपला यश मिळाले होते. बिदरच्या सहापैकी केवळ एक, तर बल्लारीतील नऊपैकी कशाबशा तीन जागा पदरात पडल्या होत्या. त्यामुळे यंदा या पाच जिल्ह्यांत कोणतीही कसर राहू नये, अशी ताकीद शाह यांनी राज्यातील नेत्यांना दिली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकElectionनिवडणूक