शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रणनीती तयार, पाच जिल्हे, पाच नेते भाजपचे ‘टार्गेट’, सिद्धरामय्या, शेट्टर, सवदी, शिवकुमार, प्रियांक खरगे ‘रडार’वर

By श्रीनिवास नागे | Updated: May 8, 2023 05:36 IST

भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे.

श्रीनिवास नागे

कलबुर्गी : भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे. खुद्द अमित शाह या मिशनवर लक्ष ठेवून आहेत.

‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?

काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार यांना अस्मान दाखवण्यासाठी शहा यांनी व्यूहरचना केली आहे. मात्र, दोघेही महावस्ताद निघाले असून, त्यांनी राज्यभर भाजपविरोधात प्रचार तोफा धडधडत ठेवल्या आहेत. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची पाठ टेकवायचीच, त्याचबरोबर प्रियांक खरगेंना पाडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्का द्यायचा यासाठीही भाजपने ‘फिल्डिंग’ लावली आहे. सिद्धरामय्यांच्या विरोधात वरुणा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री सोमय्या यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या कनकपू मतदारसंघात त्यांच्याच वक्कलिग समाजाच्या आर. अशोक यांना उतरविले आहे.

चितापुरातून प्रियांक खर्गेंच्या विरोधात माणिकरत्न राठोड यांना, तर हुबळी-धारवाड मध्यमधून शेट्टर यांच्या विरोधात महेश टेंगिनकाई यांना लांग बांधली आहे. अथणीत सवदींविरोधात महेश कुमठळ्ळी यांना मोठी ताकद दिली जात आहे.

स्पेशल प्लॅन ‘फाईव्ह बी’

nविधानसभेच्या ७२ जागा असलेल्या पाच जिल्ह्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यात बेंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारीया ‘बी’ अद्याक्षराच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

n२०१८ मध्ये या जिल्ह्यांत भाजपला केवळ ३० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने ३७ जागा खेचल्या होत्या, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने पाच जागांवर विजय मिळविला होता.

२०१८ मध्ये लागली ठेच

२०२३ मध्ये जपून पावले राजधानी बंगळुरूमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील ३२ जागा आहेत. २०१८ मध्ये त्यापैकी केवळ ११ जागा भाजपला मिळाल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १०, तर बागलकोट मधील सातपैकी पाच जागांवर भाजपला यश मिळाले होते. बिदरच्या सहापैकी केवळ एक, तर बल्लारीतील नऊपैकी कशाबशा तीन जागा पदरात पडल्या होत्या. त्यामुळे यंदा या पाच जिल्ह्यांत कोणतीही कसर राहू नये, अशी ताकीद शाह यांनी राज्यातील नेत्यांना दिली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकElectionनिवडणूक