शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भाजपा सरकार दळभद्री घुले: कोपरगावात राष्ट्रवादीचा मेळावा

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

कोपरगाव: गेल्या सात महिन्यात १८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या़ भाजपाचे सरकार अपशकुनी आणि दळभद्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली़

कोपरगाव: गेल्या सात महिन्यात १८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या़ भाजपाचे सरकार अपशकुनी आणि दळभद्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली़
राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा सत्कार व तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी कोपरगाव येथे पार पडला, यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक छबुराव आव्हाड होते़
घुले म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याची आमची मागणी असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घुले यांनी स्पष्ट केले़
आशुतोष काळे म्हणाले, माजी आ़ अशोक काळे यांनी केलेल्या विकास कामांची उद्घाटने लोकप्रतिनिधी कोपरगाव शहरासह तालुक्यात करीत आहेत़ असे असले तरीही आम्हाला जनतेच्या समस्या सुटल्याचे समाधान आहे़ जनतेला न्याय मिळावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे़ त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी असल्याचे ते म्हणाले़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, पद्मकांत कुदळे, दीपक साळुंके, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब बारहाते, सुधाकर दंडवते, सूर्यभान कोळपे, एम़टी़ रोहमारे, दत्तोबा जगताप, कारभारी आगवन, दिलीपराव बोरनारे आदींची उपस्थिती होती़