शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भाजपात मोर्चेबांधणी

By admin | Updated: May 14, 2014 04:35 IST

मतदानोत्तर चाचण्यांच्या आधारे अनेक वृत्तवाहिन्या मोदींच्या गळ्यात दिल्लीच्या सत्तेेची माळ घालून मोकळ्या झाल्या असतानाच भाजपाध्यक्षपदी राजनाथसिंह हेच कायम राहणार असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने दिले आहेत़.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली : मतदानोत्तर चाचण्यांच्या आधारे अनेक वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात दिल्लीच्या सत्तेेची माळ घालून मोकळ्या झाल्या असतानाच भाजपाध्यक्षपदी राजनाथसिंह हेच कायम राहणार असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने दिले आहेत़.आपण पक्षाध्यक्षपदाचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू, असे खुद्द राजनाथ सिंह सांगत असले तरी त्यांची सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही़ मोदी सरकारमध्ये येण्यास राजनाथ यांनी स्पष्ट नकार दिलेला नाही, असे त्यांचे समर्थक खासगीत सांगत आहेत़ पक्षाध्यक्ष म्हणून आडवाणी आणि पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या प्रकारे सलोख्याने काम केले, तसे मोदींसोबत काम करण्याचा राजनाथ यांचा मानस आहे. यामुळे साहजिकच उत्तर प्रदेशातील एक वजनदार नेते गृहमंत्रालयासोबत उपपंतप्रधानपद मिळण्याची आस बाळगून आहेत़राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने मात्र स्वत: पडद्याआड राहून नरेंद्र मोदींना सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे मोदींची व्यक्तिश: भेट घेतली आणि यानंतर पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांशीही त्यांनी सल्लामसलत केली़ या बैठकीत भागवतांनी मोदींवर विश्वास असल्याचे बोलून दाखवल्याचे समजते़ मोदी एक सच्चे स्वयंसेवक असून त्यांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत, मोदी जो काही निर्णय घेतील, तो योग्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांच्यावर भारी पडतील अशी दोन समांतर सत्ताकेंद्र संघाला नको आहेत़ रालोआ सरकारमध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना संघ लालकृष्ण आडवाणींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला़ यावेळी मात्र अशी शक्यता नाही़ राजनाथ यांना मोदी सरकारमध्ये न घेतल्यास नितीन गडकरी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे़ कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास मोदींप्रमाणेच गडकरींचाही केंद्रातील सरकारमध्ये काम करण्याचा पहिला अनुभव असेल आणि त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्यात काम सहज सोपे होईल, असे आडाखे आहेत़मोदी सरकारमध्ये अरुण जेटली क्रमांक दोनच्या स्थानावर असतील, असेही संकेत आहे़ जेटली हे दिल्लीतील मोदींचे कान आणि डोळे आहेत़ मोदींचे निकटस्थ मानले जाणार्‍या अमित शहांसोबतही त्यांनी काम केले आहे़ मोदी आणि जेटलींमध्ये चांगले संबंध आहेत़ पक्ष आणि सरकारबाबतच्या प्रत्येक निर्णयासंदर्भात मोदी त्यांच्याशी संवाद साधतात़ एवढेच नव्हे तर, संघाबाहेर अशी व्यक्ती जिच्यावर मोदी विश्वास ठेवू शकतात ते अरुण जेटली हेच आहे़त जेटलींना अर्थमंत्रालयात स्वारस्य आहे़ मंत्रिमंडळ स्थापनेत महत्त्वाची भूमिका राहणार असलेल्या जेटलींच्या या मागणीवर कालांतराने निर्णय होईलच़ जेटली उपपंतप्रधान झाले नाहीत तरीही मोदी सरकारमध्ये त्यांचे क्रमांक दोनचे स्थान अढळ मानले जात आहे़ अशा स्थितीत मोदींची खरी अडचण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आहेत़ या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आताशा कुणापासून लपून राहिलेली नाही़ या पार्श्वभूमीवर जोशींच्या गळ्यात लोकसभाध्यक्षपदाची माळ टाकली जाण्याचे संकेत आहेत़ आडवाणींबाबत मात्र अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नाही़ केवळ पांढरा हत्ती ठरलेला नियोजन आयोग गुंडाळण्याची मोदींची योजना आहे़ मोदींचे विश्वासू अमित शहा यांना पक्षातच ठेवले जाणे अपेक्षित आहे़ येत्या काळात विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्‍या सहा राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येईल, अशी शक्यता आहे़ या अनुषंगाने बुधवारी गांधीनगर येथे बैठक होत आहे़ मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीसाठी भाजपाचे अनेक बडे नेते गांधीनगरकडे रवाना झाले आहेत़.