शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला डावलल्याने भाजपाचा पराभव - रमण सिंह

By admin | Updated: February 12, 2015 10:44 IST

दिल्लीत विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवासाठी छत्तीसगडचे भाजपा नेते व मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १२ - दिल्लीत विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवासाठी भाजपाशासीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे. पक्षाने दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला निवडणुकीच्या मैदानात उतरवले नाही व त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला असे परखड मत व्यक्त करत रमण सिंह यांनी पक्षाला 'घरचा आहेर' दिला आहे. 
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यामध्ये रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला प्रोजेक्ट न करणे ही भाजपाची सर्वात मोठी चूक होती असे रमण सिंह यांचे म्हणणे आहे. दिल्लीत भाजपाने वीज, पाणी, कायदा व सुव्यवस्था अशा स्थानिक समस्यांमध्ये लक्ष घालून प्रचार कराया हवा होता असे त्यांनी नमूद केले. दिल्लीतील निकालाचे परिणाम राष्ट्रीय राजकारणावर पडतील का असा प्रश्न विचारले असता रमण सिंह म्हणाले, आप सध्या फक्त दिल्ली पुरताच मर्यादीत आहे. देशातील अन्य भागांमध्ये जनाधार वाढवण्यासाठी आपला आणखी मेहनत करावी लागेल. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीही दिल्लीतील पराभवावर नाराजी व्यक्त केली.  केंद्रीय मंत्री प्रसारमाध्यमांसमोर बसून केजरीवाल झोपडीधारकांना कसे फसवत आहेत हे सांगत बसले. पण त्यांनी हे काम थेट झोपडपट्टी परिसरात जाऊन केले पाहिजे होते असे संघाच्या एका नेत्याने सांगितले.  दिल्लीतील मतदारांसाठी आमच्याकडे घोषणापत्र नव्हते, दिल्लीकरांना आता काम करणारा पक्ष हवा होता, त्यांना राष्ट्रबांधणीमध्ये फारसा रस नव्हता असे मत दिल्लीतील संघाच्या एका कार्यकर्त्याने मांडले.