शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

भाजपा युतीनं 34 आमदारांसह मेघालयात केला सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेस सत्तेपासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2018 8:13 PM

मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे.

शिलाँग- मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्यासमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपा 2, एनपीपी 19, यूडीपी 6, एचएसपीडीपी 2, पीडीएफ 4 आणि 1 अपक्षासह 34 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवण्यात आलं आहे. आता फक्त राजभवनाकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील देण्याची औपचारिकताच बाकी आहे.तसेच नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी)चे अध्यक्ष कोनराड संगमा यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. एएनआयच्या मते, मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कोनराड संगमा यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर कोनराड संगमा म्हणाले, आम्ही 34 आमदारांच्या समर्थनासह सरकार स्थापनेचा दावा केला आहे. पुढे दोन-तीन दिवस महत्त्वाचे आहेत. सद्यस्थितीतील सरकारचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपणार आहे आणि त्यापूर्वीच सरकार स्थापणं गरजेचं आहे. उद्यापर्यंत सर्व काही स्पष्ट होईल. ज्यावेळी पत्रकारांनी संगमांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात छेडले, त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रिपदासाठी इतर सहयोगी पक्षांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. इतर पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवणं सोपं नाही हे संगमांना चांगलंच ठाऊक आहे. 

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्याही हालचालीमेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगमध्ये दाखल झालेत. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.