शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

भाजपा युतीनं 34 आमदारांसह मेघालयात केला सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेस सत्तेपासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:13 IST

मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे.

शिलाँग- मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्यासमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपा 2, एनपीपी 19, यूडीपी 6, एचएसपीडीपी 2, पीडीएफ 4 आणि 1 अपक्षासह 34 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवण्यात आलं आहे. आता फक्त राजभवनाकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील देण्याची औपचारिकताच बाकी आहे.तसेच नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी)चे अध्यक्ष कोनराड संगमा यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. एएनआयच्या मते, मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कोनराड संगमा यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर कोनराड संगमा म्हणाले, आम्ही 34 आमदारांच्या समर्थनासह सरकार स्थापनेचा दावा केला आहे. पुढे दोन-तीन दिवस महत्त्वाचे आहेत. सद्यस्थितीतील सरकारचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपणार आहे आणि त्यापूर्वीच सरकार स्थापणं गरजेचं आहे. उद्यापर्यंत सर्व काही स्पष्ट होईल. ज्यावेळी पत्रकारांनी संगमांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात छेडले, त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रिपदासाठी इतर सहयोगी पक्षांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. इतर पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवणं सोपं नाही हे संगमांना चांगलंच ठाऊक आहे. 

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्याही हालचालीमेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगमध्ये दाखल झालेत. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.