शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Mehbooba Mufti : "गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 09:04 IST

Mehbooba Mufti : गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं.

केंद्र सरकारला गुपकर आघाडीच्या (पीएजीडी) नेत्यांच्या एकजुटीची भीती वाटते, त्यामुळे सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना का समन्स पाठवले हे समजणे कठीण नसल्याचे वक्तव्य जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर वक्तव्य केले.

“काही बोलण्याची गरज आहे का? फारूख अब्दुल्ला यांना का बोलावण्यात आलं हे समजण्यासाठी तुम्हाला रॉकेट सायन्सची गरज आहे का? भारत सरकारला गुपकर आघाडीची भीती वाटते. आम्ही एकत्र आलो तर जम्मू काश्मीरबाबत त्यांनी भयावह योजना अयशस्वी होईल याची त्यांना भीती आहे,” असं मुफ्ती एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. फारूख अब्दुल्ला हे गुपकर आघाडीचे अध्यक्षदेखील आहेत.

“आम्हाला लोकांमध्ये जाऊन काम करायचं आहे. आम्ही अनेकदा काही गोष्टींचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या घराचे दरवाजे बंद आहेत, हे तुम्हाला माहित आहे. मला एका जखमी काश्मीरी पंडिताच्या घरी जायचं होतं. परंतु मला परवानगी देण्यात आली नाही. अशा स्थितीत आम्हाला आमची जागा शोधत त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावायचे आहेत. केंद्र सरकारला आमच्या राजकीय कारवायांची भीती वाटते. त्यांनी आम्हाला बदनाम करायला सर्वकाही केलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

एकजुटीची गरज"गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्याची गरज आहे, कारण ते आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतील,” असंही मुफ्ती यावेळी म्हणाल्या. ५ ऑगस्ट २०१९ नंतर दिल्लीतून जे आदेश येत आहेत त्यावरून नोकऱ्या, जमीन, संसाधने विक्रीसाठी आहेत असं दिसतं. जोपर्यंत आम्ही एकजुट होत नाही आणि विरोध करत नाही, तोवर ते आमच्या अस्थित्वाला नष्ट करण्याचे ते प्रयत्न करतील असा आरोपही मुफ्ती यांनी केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला