शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजपा व विरोधी पक्षांना प्रत्येकी पाच जागी यश

By admin | Updated: April 14, 2017 04:59 IST

दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे.

- विधानसभा पोटनिवडणूक नवी दिल्ली : दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. या ५ पैकी ३ जागा भाजपाकडेच होत्या. मात्र दिल्लीत आपचा, तर राजस्थानात बसपाचा पराभव करून भाजपाने २ जादा जागा मिळवल्या. कर्नाटकातील २ आणि मध्य प्रदेशातील १ अशा ३ जागांवर काँग्रेसला यश मिळाले असून, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचा उमेदवार विजयी झाला आहे. रविवारी या राज्यात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. सात राज्यांतील १0 जागांसाठी हे मतदान झाले होते. याशिवाय श्रीनगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. कर्नाटक, मध्यप्रदेशात प्रत्येकी दोन तर, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका जागेवर निवडणूक झाली होती. कर्नाटकातील नानजनगुड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कालाले एन. केशवमूर्ती यांनी भाजपचे के. व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. गुंडलुपेट मतदारसंघातून काँग्रेसच्या गीता महादेवप्रसाद यांनी भाजपचे सी.एस. निरंजन कुमार यांचा १० हजार मतांनी पराभव केला. या दोन्ही जागा पूर्वी काँग्रेसकडेच होत्या. एक वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. झारखंडच्या लिट्टपाडा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे सायमन मरांडी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपचा उमेदवार पराभूत झाला.

आपने जरनैैल सिंह यांच्यावर फोडले पराभवाचे खापर राजौरी गार्डन पोटनिवडणुकीतील आपच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर पक्षाने माजी आमदार जरनैैल सिंह यांच्यावर फोडले आहे. उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जरनैैल सिंह यांच्या राजीनाम्यामुळे लोक नाराज होते. ती नाराजी दूर करण्यात पक्षाला यश मिळाले नाही. दरम्यान, दिल्लीत महापालिकेसाठी होणाऱ्या मतदानापूर्वीच भाजपला मिळालेला हा विजय त्या पक्षासाठी चांगले संकेत मानले जात आहेत. या ठिकाणी आप तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. भाजप - शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांना एकूण मतांच्या ५० टक्के म्हणजे ४०,६०२ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या मिनाक्षी चंदेला यांना २५,९५० आणि आपच्या हरजीत सिंह यांना केवळ १०,२४३ मते मिळाली आहेत.