शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाजपा व विरोधी पक्षांना प्रत्येकी पाच जागी यश

By admin | Updated: April 14, 2017 04:59 IST

दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे.

- विधानसभा पोटनिवडणूक नवी दिल्ली : दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. या ५ पैकी ३ जागा भाजपाकडेच होत्या. मात्र दिल्लीत आपचा, तर राजस्थानात बसपाचा पराभव करून भाजपाने २ जादा जागा मिळवल्या. कर्नाटकातील २ आणि मध्य प्रदेशातील १ अशा ३ जागांवर काँग्रेसला यश मिळाले असून, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचा उमेदवार विजयी झाला आहे. रविवारी या राज्यात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. सात राज्यांतील १0 जागांसाठी हे मतदान झाले होते. याशिवाय श्रीनगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. कर्नाटक, मध्यप्रदेशात प्रत्येकी दोन तर, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका जागेवर निवडणूक झाली होती. कर्नाटकातील नानजनगुड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कालाले एन. केशवमूर्ती यांनी भाजपचे के. व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. गुंडलुपेट मतदारसंघातून काँग्रेसच्या गीता महादेवप्रसाद यांनी भाजपचे सी.एस. निरंजन कुमार यांचा १० हजार मतांनी पराभव केला. या दोन्ही जागा पूर्वी काँग्रेसकडेच होत्या. एक वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. झारखंडच्या लिट्टपाडा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे सायमन मरांडी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपचा उमेदवार पराभूत झाला.

आपने जरनैैल सिंह यांच्यावर फोडले पराभवाचे खापर राजौरी गार्डन पोटनिवडणुकीतील आपच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर पक्षाने माजी आमदार जरनैैल सिंह यांच्यावर फोडले आहे. उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जरनैैल सिंह यांच्या राजीनाम्यामुळे लोक नाराज होते. ती नाराजी दूर करण्यात पक्षाला यश मिळाले नाही. दरम्यान, दिल्लीत महापालिकेसाठी होणाऱ्या मतदानापूर्वीच भाजपला मिळालेला हा विजय त्या पक्षासाठी चांगले संकेत मानले जात आहेत. या ठिकाणी आप तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. भाजप - शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांना एकूण मतांच्या ५० टक्के म्हणजे ४०,६०२ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या मिनाक्षी चंदेला यांना २५,९५० आणि आपच्या हरजीत सिंह यांना केवळ १०,२४३ मते मिळाली आहेत.