शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

भाजपा व विरोधी पक्षांना प्रत्येकी पाच जागी यश

By admin | Updated: April 14, 2017 04:59 IST

दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे.

- विधानसभा पोटनिवडणूक नवी दिल्ली : दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. या ५ पैकी ३ जागा भाजपाकडेच होत्या. मात्र दिल्लीत आपचा, तर राजस्थानात बसपाचा पराभव करून भाजपाने २ जादा जागा मिळवल्या. कर्नाटकातील २ आणि मध्य प्रदेशातील १ अशा ३ जागांवर काँग्रेसला यश मिळाले असून, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचा उमेदवार विजयी झाला आहे. रविवारी या राज्यात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. सात राज्यांतील १0 जागांसाठी हे मतदान झाले होते. याशिवाय श्रीनगर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. कर्नाटक, मध्यप्रदेशात प्रत्येकी दोन तर, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका जागेवर निवडणूक झाली होती. कर्नाटकातील नानजनगुड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कालाले एन. केशवमूर्ती यांनी भाजपचे के. व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. गुंडलुपेट मतदारसंघातून काँग्रेसच्या गीता महादेवप्रसाद यांनी भाजपचे सी.एस. निरंजन कुमार यांचा १० हजार मतांनी पराभव केला. या दोन्ही जागा पूर्वी काँग्रेसकडेच होत्या. एक वर्षांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. झारखंडच्या लिट्टपाडा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे सायमन मरांडी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपचा उमेदवार पराभूत झाला.

आपने जरनैैल सिंह यांच्यावर फोडले पराभवाचे खापर राजौरी गार्डन पोटनिवडणुकीतील आपच्या उमेदवाराच्या पराभवाचे खापर पक्षाने माजी आमदार जरनैैल सिंह यांच्यावर फोडले आहे. उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जरनैैल सिंह यांच्या राजीनाम्यामुळे लोक नाराज होते. ती नाराजी दूर करण्यात पक्षाला यश मिळाले नाही. दरम्यान, दिल्लीत महापालिकेसाठी होणाऱ्या मतदानापूर्वीच भाजपला मिळालेला हा विजय त्या पक्षासाठी चांगले संकेत मानले जात आहेत. या ठिकाणी आप तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. भाजप - शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार मनजिंदर सिंह सिरसा यांना एकूण मतांच्या ५० टक्के म्हणजे ४०,६०२ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या मिनाक्षी चंदेला यांना २५,९५० आणि आपच्या हरजीत सिंह यांना केवळ १०,२४३ मते मिळाली आहेत.