शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

"हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही", बीरभूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:55 IST

Birbhum Violence Case: 'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्यातील ममता सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, काहींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काहींनी पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची मागणी करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.दरम्यान, विरोधकांच्या हल्ल्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. बीरभूम, रामपुरहाट घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ ओसी, एसडीपीओ यांना हटवले आहे आणि मी स्वतः उद्या रामपूरहाटला जाणार आहे. मी बीरभूम हत्याकांडाचे समर्थन करत नाही, पण अशा घटना यूपी, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये अधिक आहेत आणि हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. या घटनेचे राजकारण करूनही हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल."

राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे - अधीर रंजन चौधरीदरम्यान, बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तेथील लोक भीतीने जगत असून त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे.

भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.  भाजपच्या पाच खासदारांचे पथक आज घटनास्थळी पोहोचणार आहे.  पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे सांगितले की, "संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या एका आठवड्यात राज्याच्या विविध भागात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल