शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही", बीरभूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:55 IST

Birbhum Violence Case: 'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्यातील ममता सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, काहींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काहींनी पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची मागणी करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.दरम्यान, विरोधकांच्या हल्ल्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. बीरभूम, रामपुरहाट घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ ओसी, एसडीपीओ यांना हटवले आहे आणि मी स्वतः उद्या रामपूरहाटला जाणार आहे. मी बीरभूम हत्याकांडाचे समर्थन करत नाही, पण अशा घटना यूपी, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये अधिक आहेत आणि हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही. या घटनेचे राजकारण करूनही हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कारवाई केली जाईल."

राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे - अधीर रंजन चौधरीदरम्यान, बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तेथील लोक भीतीने जगत असून त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात कलम 355 लागू केले पाहिजे.

भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल हिंसाचाराच्या या प्रकरणावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.  भाजपच्या पाच खासदारांचे पथक आज घटनास्थळी पोहोचणार आहे.  पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे सांगितले की, "संपूर्ण राज्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या एका आठवड्यात राज्याच्या विविध भागात 26 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कायदा आणि पश्चिम बंगालमध्ये सुव्यवस्था बिघडली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल