शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बिमल जालान यांच्या समितीने दिला मानांकन घसरण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:57 IST

बँकांच्या फेरभांडवलीकरणानंतर भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका

मुंबई : बँकांचे फेरभांडवलीकरण (रिकॅपिटलायझेशन) करताना सरकारने स्वत:ची अधिक ओढाताण करून घेतल्यास भारताला मानांकन घसरण्याचा, तसेच भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका आहे, असा इशारा बिमल जालान समितीने दिला आहे.बँकांचा ताळेबंद विश्वसनीय असला पाहिजे, असा आग्रह धरून समितीने म्हटले की, जागतिक मंदीच्या काळात अमेरिकेने संख्यात्मक सुलभीकरणाचा पर्याय वापरला होता. तसा पर्यायच भारताकडे नाही. असे धोरण भारताला चलनातील घसरण अस्थैर्याकडे घेऊन जाईल. त्यातून वित्तीय अस्थिरतेचे संकट येईल.

रिझर्व्ह बँकेच्या भांडवली चौकटीच्या आढाव्यासाठी जालान समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी सोमवारीच सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. अहवालात म्हटले की, बँकिंग व्यवस्थेत सरकारी बँकाच प्रबळ आहेत. त्यातच भारताचे सार्वभौम मानांकन आधीच नीचांकी गुंतवणूक दर्जाचे आहे. बँकांच्या फेरभांडवलीकरणाने वित्तीय घसरण झाल्यास मानांकन आणखी खाली जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास वित्तीय संकटाची स्थिती निर्माण होईल. देशातून भांडवल बाहेर जाण्याचा धोका निर्माण होईल.समितीने म्हटले की, देशाकडे विदेशी चलनाचा मोठा साठा असला पाहिजे. संकटाच्या काळात बाह्य स्थैर्य टिकविण्यासाठी रिझर्व्ह बँक हा साठा वापरू शकते.आरबीआयचे लेखावर्ष वित्तवर्षाशी जुळवावेरिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईअर) आणि देशाचे वित्त वर्ष २०२०-२१ पासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष जुलै-जून असून, वित्त वर्ष एप्रिल-मार्च आहे. दोन्ही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही, असे समितीने म्हटले आहे.