शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

बिमल जालान यांच्या समितीने दिला मानांकन घसरण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:57 IST

बँकांच्या फेरभांडवलीकरणानंतर भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका

मुंबई : बँकांचे फेरभांडवलीकरण (रिकॅपिटलायझेशन) करताना सरकारने स्वत:ची अधिक ओढाताण करून घेतल्यास भारताला मानांकन घसरण्याचा, तसेच भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका आहे, असा इशारा बिमल जालान समितीने दिला आहे.बँकांचा ताळेबंद विश्वसनीय असला पाहिजे, असा आग्रह धरून समितीने म्हटले की, जागतिक मंदीच्या काळात अमेरिकेने संख्यात्मक सुलभीकरणाचा पर्याय वापरला होता. तसा पर्यायच भारताकडे नाही. असे धोरण भारताला चलनातील घसरण अस्थैर्याकडे घेऊन जाईल. त्यातून वित्तीय अस्थिरतेचे संकट येईल.

रिझर्व्ह बँकेच्या भांडवली चौकटीच्या आढाव्यासाठी जालान समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी सोमवारीच सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. अहवालात म्हटले की, बँकिंग व्यवस्थेत सरकारी बँकाच प्रबळ आहेत. त्यातच भारताचे सार्वभौम मानांकन आधीच नीचांकी गुंतवणूक दर्जाचे आहे. बँकांच्या फेरभांडवलीकरणाने वित्तीय घसरण झाल्यास मानांकन आणखी खाली जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास वित्तीय संकटाची स्थिती निर्माण होईल. देशातून भांडवल बाहेर जाण्याचा धोका निर्माण होईल.समितीने म्हटले की, देशाकडे विदेशी चलनाचा मोठा साठा असला पाहिजे. संकटाच्या काळात बाह्य स्थैर्य टिकविण्यासाठी रिझर्व्ह बँक हा साठा वापरू शकते.आरबीआयचे लेखावर्ष वित्तवर्षाशी जुळवावेरिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईअर) आणि देशाचे वित्त वर्ष २०२०-२१ पासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष जुलै-जून असून, वित्त वर्ष एप्रिल-मार्च आहे. दोन्ही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही, असे समितीने म्हटले आहे.