शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

बिमल जालान यांच्या समितीने दिला मानांकन घसरण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:57 IST

बँकांच्या फेरभांडवलीकरणानंतर भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका

मुंबई : बँकांचे फेरभांडवलीकरण (रिकॅपिटलायझेशन) करताना सरकारने स्वत:ची अधिक ओढाताण करून घेतल्यास भारताला मानांकन घसरण्याचा, तसेच भांडवल देशाबाहेर जाण्याचा धोका आहे, असा इशारा बिमल जालान समितीने दिला आहे.बँकांचा ताळेबंद विश्वसनीय असला पाहिजे, असा आग्रह धरून समितीने म्हटले की, जागतिक मंदीच्या काळात अमेरिकेने संख्यात्मक सुलभीकरणाचा पर्याय वापरला होता. तसा पर्यायच भारताकडे नाही. असे धोरण भारताला चलनातील घसरण अस्थैर्याकडे घेऊन जाईल. त्यातून वित्तीय अस्थिरतेचे संकट येईल.

रिझर्व्ह बँकेच्या भांडवली चौकटीच्या आढाव्यासाठी जालान समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी सोमवारीच सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. अहवालात म्हटले की, बँकिंग व्यवस्थेत सरकारी बँकाच प्रबळ आहेत. त्यातच भारताचे सार्वभौम मानांकन आधीच नीचांकी गुंतवणूक दर्जाचे आहे. बँकांच्या फेरभांडवलीकरणाने वित्तीय घसरण झाल्यास मानांकन आणखी खाली जाण्याचा धोका आहे. असे झाल्यास वित्तीय संकटाची स्थिती निर्माण होईल. देशातून भांडवल बाहेर जाण्याचा धोका निर्माण होईल.समितीने म्हटले की, देशाकडे विदेशी चलनाचा मोठा साठा असला पाहिजे. संकटाच्या काळात बाह्य स्थैर्य टिकविण्यासाठी रिझर्व्ह बँक हा साठा वापरू शकते.आरबीआयचे लेखावर्ष वित्तवर्षाशी जुळवावेरिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईअर) आणि देशाचे वित्त वर्ष २०२०-२१ पासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष जुलै-जून असून, वित्त वर्ष एप्रिल-मार्च आहे. दोन्ही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही, असे समितीने म्हटले आहे.