शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

बिहारमध्ये सत्तासंघर्ष!

By admin | Updated: February 10, 2015 03:19 IST

बिहारमधील सत्तासंघर्षातून घटनात्मक पेच वाढला असून, संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार आणि पक्षाचा आदेश धुडकावून मुख्यमंत्रिपदावर कायम राहणारे जितनराम मांझी

पाटणा/नवी दिल्ली : बिहारमधील सत्तासंघर्षातून घटनात्मक पेच वाढला असून, संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार आणि पक्षाचा आदेश धुडकावून मुख्यमंत्रिपदावर कायम राहणारे जितनराम मांझी यांच्यात आरपारची लढाई सुरू झाली आहे. उभयतांनी सोमवारी येथे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन विश्वासमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.दरम्यान, संयुक्त जनता दलाने पक्षासोबत बंडाळी करून मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे आणि नितीशकुमार यांच्या मार्गातील काटा बनलेले जितनराम मांझी यांच्यावर बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवीत अखेर त्यांना बडतर्फ केले आणि ४८ तासांच्या आत मांझी यांना विधानसभेत शक्तिपरीक्षण करण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती राज्यपाल त्रिपाठी यांना केली. मांझींनी विधानसभेत शक्तिपरीक्षणाशिवाय राजीनामा देण्यास नकार दिल्याने या पक्षातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. रविवारी मोदी यांची भेट घेतल्यापासून मांझी ज्या अविर्भावात बोलत आहेत त्यावरून त्याची पटकथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी लिहिली गेल्याचे स्पष्ट होते, असा जदयूचा आरोप आहे. संयुक्त जनता दलाने मांझी यांना बडतर्फ केल्यानंतर काही तासांतच राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल त्रिपाठी यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी समर्थनार्थ १३० आमदारांची यादीही सादर केली. > राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्यासोबत एक तासाची बैठक आटोपून राजभवनातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, जदयूचे वरिष्ठ नेते नितीशकुमार व जदयूचे प्रमुख शरद यादव.> सरकार स्थापनेची संधी नाकारल्यास अथवा चालढकल झाल्यास आम्ही सर्व १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमक्ष हजर करू. यासाठी आम्ही राष्ट्रपतींकडे ११ फेब्रुवारीची वेळ मागितली असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. १३० आमदार पाठीशी : संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भाकपासह सर्व १३० आमदार राजभवनाबाहेर हजर होते. या सर्वांची ओळखपरेड करण्याची तयारी कुमार यांनी दर्शविली. परंतु राज्यपालांनी त्याची गरज नसल्याचे सांगितले. > मांझींचा दावा : जितनराम मांझी ३ वाजता राजभवनावर धडकले. नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड असंवैधानिक आहे. सभागृहात आपण बहुमत सिद्ध करू, असा दावा मांझींनी केला.