शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये जदयूमधील सत्तासंघर्ष टोकाला

By admin | Updated: February 6, 2015 12:18 IST

बिहारमधील सत्ताधारी जनता दल मधील(संयुक्त) अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला असून मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बंडाचे संकेत दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 
पाटणा, दि. ६ - बिहारमधील सत्ताधारी जनता दल मधील(संयुक्त) अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला असून मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बंडाचे संकेत दिले आहे. जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीत जाण्यास मांझी यांनी नकार दिला आहे. मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यास मांझी विधानसभाच बरखास्त करतील अशी चर्चा असल्याने बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 
लोकसभा निवडणुकीत बिहारमधील निराशाजनक कामगिरीनंतर जदयू नेते नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती. मात्र मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच मांझी यांनी बेताल वक्तव्य करत पक्षाचीच कोंडी केली. अखेरीस नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय जदयूच्या नेत्यांनी घेतला आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांनीदेखील नितीशकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी शनिवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली होती.  मांझी यांना २३ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या विधीमंडळ समितीच्या बैठकीत राजीनामा द्यायला लावायचा अशी योजना जदयू नेतृत्वाने आखली होती. मात्र मांझी यांना हा निर्णय फारसा भावलेला दिसत नाही. मांझी यांनी शरद यादव यांच्या बैठकीला जाण्यास नकार दिला असून २० फेब्रुवारी रोजी त्यांनी स्वतः आमदारांची बैठक बोलवली आहे. मी स्वतः विधीमंडळ समितीचे नेते असून अन्य नेत्यांनी आमदारांची बैठक बोलवणे अवैध आहे असा दावा मांझी यांनी केला. मांझी यांना जदयूतील २५ आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लावणे जदयूसाठी कठीण झाले आहे. आता या पक्षांतर्गत बंडावर नितीशकुमार काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.