शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

लालू ठरले बिहारचे 'बाहुबली'

By admin | Updated: November 8, 2015 17:43 IST

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

 
पाटणा, दि.  ८ -  २००५ च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव आणि चारा घोटाळ्यात झालेली तुरुंगवासाची शिक्षा यामुळे लालूप्रसाद यादव यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे. 
 
तब्बल १५ वर्ष बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राज्य होते. २००५ च्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयू आणि भाजपा युतीने बिहारमधून लालूंचे साम्राज्य खालसा केले. त्यानंतर लालूप्रसाद यांची पिछेहाटच सुरु झाली. विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा पराभव सुरु होता. २०१० मधील विधानसभा निवडणुकीत राजदला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१३ मध्ये चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना दोषी ठरवण्यात आले व त्यांना खासदारकीही गमवावी लागली. लालूंना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा मार्गही बंद झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजदला ४० पैकी फक्त ४ जागांवरच विजय मिळाल्याने बिहारमध्ये लालूपर्वाची अखेर झाल्याची चर्चा सुरु झाली. 
गेल्या वर्षभरात लालूप्रसाद यांनी बिहारच्या राजकारणात पुनरागमन करण्यासाठी अथक मेहनत घेतली. लालूंची पत्नी राबडीदेवी राजकारणात येण्यासाठी तयार नव्हत्या तर लालूंचे पुत्र तेजप्रताप आणि तेजस्वी हे दोघेही मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याच्या दृष्टीने फारसे अनुभवी नव्हते. अशा स्थितीत  मोदींना घडवण्यासाठी लालूंनी कट्टरविरोधक नितीशकुमार यांच्याशी घरोबा साधला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लालूंनी सर्वाधिक म्हणजेच तब्बल २४२ हून अधिक सभा घेतल्या. आरक्षण, हिंदूत्ववादाच्या मुद्द्यावर लालूंनी भाजपावर जहरी टीका केली. बीफच्या विधानावरुन भाजपाने लालूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहारी जनतेने भाजपाला फारसा प्रतिसाद दिला नाही याऊलट लालूंना भरभरुन मतं दिली. एकेकाळी बिहारचे किंग म्हणून ओळखले जाणारे लालू आता बिहारचे किंगमेकर ठरले आहेत. निवडणुकीनंतर लालूंनी नितीशकुमारच आगामी मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी लालूंच्या दोन्ही पुत्रांपैकी एकाची निवड होईल अशी शक्यता आहे.