शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लालू ठरले बिहारचे 'बाहुबली'

By admin | Updated: November 8, 2015 17:43 IST

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

 
पाटणा, दि.  ८ -  २००५ च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव आणि चारा घोटाळ्यात झालेली तुरुंगवासाची शिक्षा यामुळे लालूप्रसाद यादव यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांनी सर्वाधिक ८० जागांवर आघाडी घेत बिहारच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे. 
 
तब्बल १५ वर्ष बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राज्य होते. २००५ च्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयू आणि भाजपा युतीने बिहारमधून लालूंचे साम्राज्य खालसा केले. त्यानंतर लालूप्रसाद यांची पिछेहाटच सुरु झाली. विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा पराभव सुरु होता. २०१० मधील विधानसभा निवडणुकीत राजदला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१३ मध्ये चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना दोषी ठरवण्यात आले व त्यांना खासदारकीही गमवावी लागली. लालूंना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा मार्गही बंद झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजदला ४० पैकी फक्त ४ जागांवरच विजय मिळाल्याने बिहारमध्ये लालूपर्वाची अखेर झाल्याची चर्चा सुरु झाली. 
गेल्या वर्षभरात लालूप्रसाद यांनी बिहारच्या राजकारणात पुनरागमन करण्यासाठी अथक मेहनत घेतली. लालूंची पत्नी राबडीदेवी राजकारणात येण्यासाठी तयार नव्हत्या तर लालूंचे पुत्र तेजप्रताप आणि तेजस्वी हे दोघेही मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याच्या दृष्टीने फारसे अनुभवी नव्हते. अशा स्थितीत  मोदींना घडवण्यासाठी लालूंनी कट्टरविरोधक नितीशकुमार यांच्याशी घरोबा साधला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लालूंनी सर्वाधिक म्हणजेच तब्बल २४२ हून अधिक सभा घेतल्या. आरक्षण, हिंदूत्ववादाच्या मुद्द्यावर लालूंनी भाजपावर जहरी टीका केली. बीफच्या विधानावरुन भाजपाने लालूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बिहारी जनतेने भाजपाला फारसा प्रतिसाद दिला नाही याऊलट लालूंना भरभरुन मतं दिली. एकेकाळी बिहारचे किंग म्हणून ओळखले जाणारे लालू आता बिहारचे किंगमेकर ठरले आहेत. निवडणुकीनंतर लालूंनी नितीशकुमारच आगामी मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी लालूंच्या दोन्ही पुत्रांपैकी एकाची निवड होईल अशी शक्यता आहे.