शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिहारमध्येही काँग्रेसमध्ये संकट : १८ आमदार निघाले होते नितीश यांच्यामागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 02:47 IST

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटविण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दहा कलमी मागण्यांचे पत्रही दिले आहे. वीरभद्र सिंह यांच्या आग्रही भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकांआधीच काँग्रेसपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे बिहारमधील काँग्रेसमध्येही पेचप्रसंग निर्माणझाला आहे. अर्थात तो दूर करण्यात काँग्रेस श्रेष्ठींना तूर्त तरी यश आले आहे.गेल्या दोन दिवसांपासून वीरभद्र सिंह दिल्लीत आहेत. त्यांनी बुधवारी सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुखू यांना हटवून त्यांच्या जागी आशा कुमारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच निवडणुकीत मुक्त हस्त द्यावा, अशा मागण्यांसह त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका पत्रात मांडली आहेत.काँग्रेसने मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वीरभद्र सिंह यांच्या या पत्राबाबत कल्पना नसल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. सुखविंदर सिंह सुखू यांची नियुक्ती राहुल गांधी गटाने केली असल्याने प्रदेशाध्यक्ष सुखविंदर यांना हटविण्याच्या निर्णयाला त्यांची मंजुरी घ्यावी लागेल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, बिहारमधील काँग्रेसमधील राजकीय संकट दूर करण्यात पक्षाच्या श्रेष्ठींना तात्पुरतेच यश आले आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी व बिहार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सदानंद सिंह यांनी पक्ष सोडून नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याची भाषा सुरू केली असल्याचे पत्र तीन आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविले होते.दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी हे पत्र तयार केले असून, त्यावर ते आमदारांच्या सह्या घेत आहेत आणि आतापर्यंत १४ आमदारांच्या सह्याही घेतल्या आहेत. आता दोनतृ्तीयांश आमदारांच्या सह्या झाल्या असून, आणखी चार आमदारांच्या सह्या होणे बाकी आहे, अशी माहितीही तीन आमदारांनी सोनिया गांधी यांना दिली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी चौधरी व सिंह यांना लगेच दिल्लीत बोलावून समज दिली. त्या वेळी अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, पी. सी. जोशी हेही उपस्थित होते.२७ आमदारांच्या पाठिंब्याचा दावामुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी आपणास २७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाकेला आहे. तसेच विधानसभेची आगामी निवडणूक न लढविण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाने दखल देऊन मार्ग काढावा, असे त्यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. अन्यथा आम्हीही निवडणूक लढविणार नाही, असे म्हटले आहे.किती काळ शांतता? : त्यानंतर अशोक चौधरी व सदानंद सिंह यांनी आम्ही पक्ष सोडणार नाही आणि सर्व आमदारांनाही तसे समजावू, असे आश्वासन सोनिया गांधी यांना दिल्याचे समजते. त्यामुळे बिहार काँग्रेसमधील संकट तूर्त थांबले आहे, असे दिसते. मात्र अशी स्थिती किती काळ राहील, हे सांगणे अवघड आहे.