शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Bihar Politics: सत्ता येताच रंग बदलले, लालूंचे पुत्र माध्यमांवर भडकले, पाहा शपथविधीवेळी नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 19:43 IST

Tej Pratap Yadav: आज राजभवनामध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाला. तेव्हा राबडी देवी आणि तेजस्वी यदव यांच्या पत्नींसोबत तेजप्रताप यादव पहिल्या रांगेत होते. तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्यावेळी तेजप्रताप यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रसारमाध्यमांवर भडकण्यास सुरुवात केली.

पाटणा - बिहारमध्ये अगदी शांतपणे सत्ता परिवर्तन झाले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून विरोधी पक्षात असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाकडे पुन्हा सत्ता आली आहे. त्यामुळे राबडी देवी, तेज प्रताप आणि तेजस्वी यादव सध्या आनंदात आहेत. यामध्ये तेज प्रताप यादव आघाडीवर आहेत. तसेच नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सरकार बनवण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालंकडे जात असताना त्यांच्या सोबत तेजप्रतापसुद्धा होते. दरम्यान, आज राजभवनामध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाला. तेव्हा राबडी देवी आणि तेजस्वी यदव यांच्या पत्नींसोबत तेजप्रताप यादव पहिल्या रांगेत होते. तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्यावेळी तेजप्रताप यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रसारमाध्यमांवर भडकण्यास सुरुवात केली.

तापट स्वभावासाठी परिचित असलेले तेजप्रताप यावर आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात पहिल्या रांगेत होते. सोफ्यावर एका बाजूला तेजप्रतप यादव तर दुसऱ्या बाजूवा तेजस्वी यादव यांची पत्नी राजश्री बसली होती. तर मध्ये राबडी देवी बसल्या होत्या. तेवढ्यात प्रसारमाध्यमांनी राबडी देवी आणि त्यांची सून राजश्री यांच्याकडे धाव घेतली. तसेच तेजस्वी यादव यांच्या शपथविधीबाबत काय वाटते, अशी विचारणा केली. राजश्री ह्या जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी होत होत्या त्यामुळे माध्यमांचे लक्ष त्यांच्याकडे होते. तेवढ्यात तेज प्रताप यादव यांचा पारा चढला.

एकीकडे शपथ ग्रहण सोहळ्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंचासमोर होत असलेला गोंधळ पाहून राजभवनातील मोठा अधिकारी धावत-पळत पुढे आला. त्याने प्रसारमाध्यमांना विनंती करून तिथून बाजूला केले. मात्र यादरम्यान, तेज प्रताप यादव यांचा पारा चढलेले होता. ते तोंडात पुटपुटत होते. तसेच प्रसारमाध्यमांना वारंवार आरएसएसचे एजंट म्हणत होते. त्यांचा मूड खूपच गरम झाला होता. जर अधिकाऱ्यांनी वेळीच येऊन हस्तक्षेप केला नसता तर परिस्थिती अधिकच बिघडली असती. दरम्यान प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथून निघून गेल्यावर प्रकरण शांत झाले.   

टॅग्स :BiharबिहारTej Pratap Yadavतेज प्रताप यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल