शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कारागृहातून फोन प्रकरणात लालू अडचणीत, पाटण्यात FIR; रांचीच्या बंगल्याहून रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 18:11 IST

दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना रांची येथील 1 केली बंगल्याहून राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स)मध्ये हलविण्यात आले आहे. लालू हे चारा घोटाळ्यातील दोषी असून शिक्षा भोगत आहेत.

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारागृहातूनच भाजप आमदार ललन पासवान यांना फोन केल्याप्रकरणी लालूंविरोधात पाटणा येथील पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. खुद्द ललन पासवान यांनी ही FIR दाखल केली आहे. त्यांनी लालूंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.   

दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना रांची येथील 1 केली बंगल्याहून राजेंद्र इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स)मध्ये हलविण्यात आले आहे. लालू हे चारा घोटाळ्यातील दोषी असून शिक्षा भोगत आहेत.

जेलमधून फोन करत ललन पासवान यांना प्रलोभन दिल्याप्रकरणी हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (HAM) अध्यक्ष जीतन राम मांझी म्हणाले, मला सांगण्यात आले, की लालू यादवांनी अनेक लोकांना फोन केले. त्यांची माझ्याबरोबरही बोलण्याची इच्छा होती. मात्र, मी त्यांच्याशी बोललो नाही. जीतनराम मांझी म्हणाले लालू प्रसादांचा इरादा चुकीचा आहे.

सुशील कुमार मोदींनी केला होता आरोप -बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि बीजेपी नेते सुशील कुमार मोदी यांच्या आरोपानंतर बिहारचे राजकारण ढवळून निघत आहे. सुशील कुमार मोदी यांनी आरोप केला होता, की लालू यादव हे रांचीमधील रिम्सच्या 1 केली बंगल्यातूनच NDAच्या आमदारांना प्रलोभन देत होते आणि नितीश कुमारांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. भाजपने लालूंचा आणि आमदार ललन पासवान यांच्या संवादाचा ऑडिओदेखील जारी केला आहे. भाजप आमदार ललन पासवान म्हणाले, लालू प्रसादांनी त्यांना मंत्रीपद देऊ केले आणि बिहार विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, ललन पासवान यांनी म्हटले आहे, की ते पक्षाबरोबर आहेत.

आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं -  बिहार निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले होते, तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवले गेले आहे, असेदेखील तेजस्वी यांनी म्हटले होते. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत, अशी मागणीही केली होती. "जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला", असेही तेजस्वी यादव म्हटले होते. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मते मोजणे अत्यंत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले होते.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहारBJPभाजपा