शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:36 IST

Prashant Kishor News: बिहारमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.  

नुकत्याच झालेल्या बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. तर नव्यानेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा दारुण पराभव झाला होता. दरम्यान, या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे.  

अमेरिकेमध्ये बिहारी समुदायाशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सद्यस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, बिहार हे एक असं राज्य आहे जे अनेक बाजूंनी अडचणीत सापडलेलं आहे. जर बिहार हा एक देश असता तर तो जगातील ११ वा सर्वात मोठा देश असला असता. आम्ही लोकसंख्येच्याबाबतीत जपानला मागे टाकलं आहे. येथील समाज हा सुधारणांबाबत नाउमेद झाला आहे, हेच सर्वात मोठं आव्हान आहे.  

या परिसंवादामध्ये प्रशांक किशोर यांनी बिहारमधील पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी आपला पक्ष हा २०२५ वर्षे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठी नुकत्यात झालेल्या पोटनिवडणुकीत राज्यातील सत्ताधारी एनडीए आघाडीने दणदणीत यश मिळवलं होतं. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती.   

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार