शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

“श्रीराम देव नाही, माझा रामावर विश्वास नाही, ते केवळ एक पात्र”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:14 IST

पूजापाठ केल्याने कोणी मोठे होत नाही. अनुसूचित जातीच्या लोकांनी ते बंद केले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सिकंदरा: यंदाच्या श्रीराम नवमीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. देशातील काही ठिकाणी राम नवमी उत्सवात हिंसाचाराच्या घटना घडल्याने याला गालबोट लागले. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता एका माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हे विधान केले आहे. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. जमुई जिल्ह्यामधील सिकंदरा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मांझी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्री रामचंद्रांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रभू श्रीरामचंद्र काही देव नाही ते केवळ एक पात्र होते, माझा रामावर विश्वास नाही, असे मांझी यांनी म्हटले आहे. आपण रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदास यांना मानतो. राम काही देवा नव्हता. वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी आपली गोष्ट सांगण्यासाठी एक पात्र बनवले, ते रामाचे होते, असेही ते म्हणाले. 

महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात

वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी या पात्राच्या आधारे त्यांनी एक महाकाव्य रचले. या महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात. त्या गोष्टी मी मानतो, मात्र मी रामाला मानत नाही, असे मांझी म्हणाले. पूजा केल्याने कोणी मोठे होत नाही. पाठपूजा करणे अनुसूचित जातीच्या लोकांनी बंद केले पाहिजे, असेही मांझी यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. 

दरम्यान, जे ब्राह्मण मांस खातात, मद्यप्राशन करतात अशा ब्राह्मणांपासून दूर राहिले पाहिजे. अशा ब्राह्मणांकडून पूजा आणि धार्मिक विधी करुन घेता कामा नये. तुम्ही पूजापाठ करणं बंद करा, असे आवाहन मांझी यांनी केले.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण