शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“श्रीराम देव नाही, माझा रामावर विश्वास नाही, ते केवळ एक पात्र”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:14 IST

पूजापाठ केल्याने कोणी मोठे होत नाही. अनुसूचित जातीच्या लोकांनी ते बंद केले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सिकंदरा: यंदाच्या श्रीराम नवमीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. देशातील काही ठिकाणी राम नवमी उत्सवात हिंसाचाराच्या घटना घडल्याने याला गालबोट लागले. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता एका माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हे विधान केले आहे. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. जमुई जिल्ह्यामधील सिकंदरा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मांझी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्री रामचंद्रांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रभू श्रीरामचंद्र काही देव नाही ते केवळ एक पात्र होते, माझा रामावर विश्वास नाही, असे मांझी यांनी म्हटले आहे. आपण रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदास यांना मानतो. राम काही देवा नव्हता. वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी आपली गोष्ट सांगण्यासाठी एक पात्र बनवले, ते रामाचे होते, असेही ते म्हणाले. 

महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात

वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी या पात्राच्या आधारे त्यांनी एक महाकाव्य रचले. या महाकाव्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्यात. त्या गोष्टी मी मानतो, मात्र मी रामाला मानत नाही, असे मांझी म्हणाले. पूजा केल्याने कोणी मोठे होत नाही. पाठपूजा करणे अनुसूचित जातीच्या लोकांनी बंद केले पाहिजे, असेही मांझी यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. 

दरम्यान, जे ब्राह्मण मांस खातात, मद्यप्राशन करतात अशा ब्राह्मणांपासून दूर राहिले पाहिजे. अशा ब्राह्मणांकडून पूजा आणि धार्मिक विधी करुन घेता कामा नये. तुम्ही पूजापाठ करणं बंद करा, असे आवाहन मांझी यांनी केले.  

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण