शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 14:39 IST

Bihar Election 2020 : 'म्हशी'वर स्वार झालेल्या या उमेदवाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान एक अपक्ष उमेदवार सायकल अथवा कार नाही तर चक्क 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल करण्यासाठी आलेले पाहायला मिळाले. 

'म्हशी'वर स्वार झालेल्या या उमेदवाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे. पालीगंज विधानसभा मतदार संघात 'पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिव्ह'चे रविंद्र प्रसाद उर्फ कपिल यादव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हटके अंदाजात आले. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही वाजत गाजत आले होते. सोशल मीडियावर उमेदवाराचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

म्हशीवर स्वार होण्याबाबत जेव्हा स्थानिक पत्रकारांनी कपिल यादव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळेच म्हशीवर स्वार होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. मी गरिबांची मदत करू इच्छितो, त्यामुळेच निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला" असं म्हटलं आहे. व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान

"कोरोनाचे संकट असल्याने जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे" अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील.  यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील"

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूक