शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

बिहार पराभवानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी, गांधी कुटुंबावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 12, 2020 12:04 IST

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती.

ठळक मुद्देमहाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे.काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. महाआघाडीत एकूण 70 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 19 जागाच जिंकता आल्या. आता या सुमार कामगिरीवरून राज्यात काँग्रेसमध्येच विरोधाचे स्वर उमटू लागले आहेत. अनेक वरिष्ठ नेत्यांनी तर पक्षाच्या जगा घसरल्याबद्दल गांधी कुटुंबालाच जबाबदार धरले आहे. अशाच एका असंतुष्ट गटाने म्हटले आहे, की काँग्रेसमुळेच महाआघाडीतील सहकारी पक्ष राजद आणि डाव्या पक्षांना फटका बसला आहे.

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी त्यांनी 75 जागा जिंकल्या आहेत. तसेच १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे. अर्थात महाआघाडीत काँग्रेसच्या विजयाची सरासरी सर्वात कमी आहे. 

बिहार काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे, की बिहार निवडणुकीसाठी पक्षाने चुकीच्या माणसांना तिकीट दिले. याच बरोबर AIMIM फॅक्टर आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसला. याच बरोबर काही नेत्यांनी म्हटले आहे, की काँग्रेसला अशा १३ जागा मिळाल्या होत्या, जेथे काँग्रेसने आतापर्यंत निवडणूकच लढवलेली नव्हती. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत पक्षाची कामगिरी चांगली राहिली. याशिवाय काँग्रेसने अशा २६ जागांवर निवडणूक लढवली होती, जेथे गेल्या तीन दशकांत महाआघाडीतील कुण्याही पक्षाला विजय मिळवला आलेला नाही.

३७ जागांवर भाजपशी थेट लढत -काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला. बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.

पांडे फक्त सहायकाच्या भूमिकेत -काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले  होते असा आरोप त्या पक्षाच्या  काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी  केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी