शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बिहार पराभवानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी, गांधी कुटुंबावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 12, 2020 12:04 IST

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती.

ठळक मुद्देमहाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे.काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. महाआघाडीत एकूण 70 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 19 जागाच जिंकता आल्या. आता या सुमार कामगिरीवरून राज्यात काँग्रेसमध्येच विरोधाचे स्वर उमटू लागले आहेत. अनेक वरिष्ठ नेत्यांनी तर पक्षाच्या जगा घसरल्याबद्दल गांधी कुटुंबालाच जबाबदार धरले आहे. अशाच एका असंतुष्ट गटाने म्हटले आहे, की काँग्रेसमुळेच महाआघाडीतील सहकारी पक्ष राजद आणि डाव्या पक्षांना फटका बसला आहे.

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी त्यांनी 75 जागा जिंकल्या आहेत. तसेच १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे. अर्थात महाआघाडीत काँग्रेसच्या विजयाची सरासरी सर्वात कमी आहे. 

बिहार काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे, की बिहार निवडणुकीसाठी पक्षाने चुकीच्या माणसांना तिकीट दिले. याच बरोबर AIMIM फॅक्टर आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसला. याच बरोबर काही नेत्यांनी म्हटले आहे, की काँग्रेसला अशा १३ जागा मिळाल्या होत्या, जेथे काँग्रेसने आतापर्यंत निवडणूकच लढवलेली नव्हती. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत पक्षाची कामगिरी चांगली राहिली. याशिवाय काँग्रेसने अशा २६ जागांवर निवडणूक लढवली होती, जेथे गेल्या तीन दशकांत महाआघाडीतील कुण्याही पक्षाला विजय मिळवला आलेला नाही.

३७ जागांवर भाजपशी थेट लढत -काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला. बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.

पांडे फक्त सहायकाच्या भूमिकेत -काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले  होते असा आरोप त्या पक्षाच्या  काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी  केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी