शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पराभवानंतर काँग्रेसमध्ये असंतोषाची ठिणगी, गांधी कुटुंबावर उपस्थित केले जातेय प्रश्नचिन्ह

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 12, 2020 12:04 IST

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती.

ठळक मुद्देमहाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे.काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. महाआघाडीत एकूण 70 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ 19 जागाच जिंकता आल्या. आता या सुमार कामगिरीवरून राज्यात काँग्रेसमध्येच विरोधाचे स्वर उमटू लागले आहेत. अनेक वरिष्ठ नेत्यांनी तर पक्षाच्या जगा घसरल्याबद्दल गांधी कुटुंबालाच जबाबदार धरले आहे. अशाच एका असंतुष्ट गटाने म्हटले आहे, की काँग्रेसमुळेच महाआघाडीतील सहकारी पक्ष राजद आणि डाव्या पक्षांना फटका बसला आहे.

महाआघाडीने बिहार निवडणुकीत एकूण ११० जागा जिंकल्या आहेत. येथे तेजस्वी यांच्या नेतृत्वातील राजदने एकूण १४४ जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी त्यांनी 75 जागा जिंकल्या आहेत. तसेच १९ जागांवर लढलेल्या CPI-MLनेही १२ जागांवर विजय मिळवला आहे. अर्थात महाआघाडीत काँग्रेसच्या विजयाची सरासरी सर्वात कमी आहे. 

बिहार काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे, की बिहार निवडणुकीसाठी पक्षाने चुकीच्या माणसांना तिकीट दिले. याच बरोबर AIMIM फॅक्टर आणि अखेरच्या टप्प्यात झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसला. याच बरोबर काही नेत्यांनी म्हटले आहे, की काँग्रेसला अशा १३ जागा मिळाल्या होत्या, जेथे काँग्रेसने आतापर्यंत निवडणूकच लढवलेली नव्हती. मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांत पक्षाची कामगिरी चांगली राहिली. याशिवाय काँग्रेसने अशा २६ जागांवर निवडणूक लढवली होती, जेथे गेल्या तीन दशकांत महाआघाडीतील कुण्याही पक्षाला विजय मिळवला आलेला नाही.

३७ जागांवर भाजपशी थेट लढत -काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला. बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.

पांडे फक्त सहायकाच्या भूमिकेत -काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले  होते असा आरोप त्या पक्षाच्या  काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी  केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी