ऑनलाइन टीम
पाटणा, दि १७ - लोकसभा निवडणुकीत जनता दल युनाटेडच्या झालेल्या मानहानीकारक पराभवाची जबाबादारी स्वीकारत बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत जदयूला ४०पैकी अवघ्या २ जागा मिळाल्या. या पराभवाची नैतिक जबाबादारी स्वीकारत नीतिश कुमार यांनी शनिवारी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेत राज्यापालांकडे राजीनामा सोपवला.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची जबाबादारी आपल्या खाद्यांवर होती, त्यामुळे पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबादारी स्वीकारत आपण राजीनाम देत असल्याचे नीतिश कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र असे असले तरीही आपण विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भाजपसोबत युती तोडण्याचा निर्णय योग्यच होता असे विधानही त्यांनी केले.