शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मला इच्छामरण द्या; 15 वर्षाच्या मुलाने केली राष्ट्रपतींना पत्र लिहून मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 09:31 IST

माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही

ठळक मुद्दे15 वर्षाच्या मुलाने राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहेकौंटुबिक कलहाला कंटाळून मुलाने मागितली परवानगी पंतप्रधान कार्यालयाने दिले जिल्हा प्रशासनला चौकशीचे आदेश

भागलपूर - बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने कौटुंबिक कलहाला कंटाळून इच्छामरणाची मागणी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या विद्यार्थ्याने इच्छा मरणाची मागणी केली आहे. राष्ट्रपतींकडून हे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आलं आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. सरकारी सूत्रांनुसार मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत.

भागपूर जिल्ह्यातील कहलगाव ठाणे अंतर्गत असणाऱ्या महिषामुंडा गावातील रहिवाशी मनोज कुमार मित्रा यांच्या 15 वर्षीय मुलाने राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. कृष कुमार मित्रा असं या मुलाचं नाव आहे. कृषने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्याचसोबत कृषने पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठविलं होतं. 

कृष मित्राने पत्रात लिहिलं आहे की, माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. तर माझे वडील कॅन्सर पीडित आहेत. ते सध्या ग्रामीण विकास विभागात जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई सुजाता इंडियन ओवरसीज बँक पटणा येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहे.

कृष हा त्याचे वडील मनोज कुमार मित्रा यांच्यासोबत राहतो. तो सध्या नववीच्या वर्गात शिकत आहे. मनोज आणि त्यांची पत्नी सुजाता यांच्यात अनेक वर्षापासून वादविवाद सुरु आहेत. त्यांच्या भांडणामुळे हे दोघंही वेगळे राहतात. कृषच्या घरच्यांना सुजाताचं वागणं पटत नाही त्यामुळे घरात वाद निर्माण होतात. या सगळ्या कौटुंबिक कलहामुळे माझी जगण्याची इच्छा नाही असं कृषने सांगितले आहे. त्यामुळे आपण राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधानांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधानEuthanasiaइच्छामरण