शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:11 IST

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तिन्ही आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजघराण्याच्या संपत्तीवरून सुरु असलेला वाद आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे यांच्या तीन आत्यांसोबत गेल्या १५ वर्षांपासून हा वाद सुरु असून संपत्तीच्या वाटणीवर ग्वाल्हेरच्या उच्च न्यायालयाने ९० दिवसांत सर्वांच्या सहमतीने, सामोपचाराने हा वाद सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. 

वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना यासाठी ९० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. नंतर तो उच्च न्यायालयात गेला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तिन्ही आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. २०१७ मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आले होते. दोन्ही पक्षकारांकडून यापूर्वीही तडजोडीचा प्रयत्न झाला होता, परंतू त्यास यश आले नव्हते. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९० दिवसांत हा वाद सोडवावा लागणार आहे. 

या प्रकरणात  २८ पक्षकार आणि १३ ट्रस्ट सामील आहेत. या वादातील सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे जय विलास पॅलेस, ज्याचे अंदाजित मूल्य १०,००० कोटी रुपये आहे. हा पॅलेस १२.४० लाख चौरस फूट जागेत पसरलेला असून त्यात ४०० खोल्या आहेत. तसेच या मालमत्तांमध्ये शिवपुरी आणि उज्जैन येथील पॅलेस तसेच दिल्ली, पुणे आणि गोव्यातील इतर मालमत्तांचा समावेश आहे. जर हा मोठा पॅलेस एकाच्या वाट्याला गेला तर त्याला दुसरे काहीच मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे कोणीही सामोपचारासाठई तयार होत नाहीय. 1874 मध्ये हा पॅलेस उभारण्यासाठी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्याची किंमत १० हजार कोटी रुपये झाली आहे. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेHigh Courtउच्च न्यायालय