शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:11 IST

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तिन्ही आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजघराण्याच्या संपत्तीवरून सुरु असलेला वाद आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे यांच्या तीन आत्यांसोबत गेल्या १५ वर्षांपासून हा वाद सुरु असून संपत्तीच्या वाटणीवर ग्वाल्हेरच्या उच्च न्यायालयाने ९० दिवसांत सर्वांच्या सहमतीने, सामोपचाराने हा वाद सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. 

वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना यासाठी ९० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. नंतर तो उच्च न्यायालयात गेला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तिन्ही आत्यांनी त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. २०१७ मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आले होते. दोन्ही पक्षकारांकडून यापूर्वीही तडजोडीचा प्रयत्न झाला होता, परंतू त्यास यश आले नव्हते. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ९० दिवसांत हा वाद सोडवावा लागणार आहे. 

या प्रकरणात  २८ पक्षकार आणि १३ ट्रस्ट सामील आहेत. या वादातील सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे जय विलास पॅलेस, ज्याचे अंदाजित मूल्य १०,००० कोटी रुपये आहे. हा पॅलेस १२.४० लाख चौरस फूट जागेत पसरलेला असून त्यात ४०० खोल्या आहेत. तसेच या मालमत्तांमध्ये शिवपुरी आणि उज्जैन येथील पॅलेस तसेच दिल्ली, पुणे आणि गोव्यातील इतर मालमत्तांचा समावेश आहे. जर हा मोठा पॅलेस एकाच्या वाट्याला गेला तर त्याला दुसरे काहीच मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे कोणीही सामोपचारासाठई तयार होत नाहीय. 1874 मध्ये हा पॅलेस उभारण्यासाठी ९९ लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्याची किंमत १० हजार कोटी रुपये झाली आहे. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेHigh Courtउच्च न्यायालय