शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अतुल सुभाष आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पत्नी निकिता सिंघानिया आणि सासू-सासऱ्यांनाही जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:57 IST

अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आथा कोर्टाने त्यांच्या पत्नी आणि सासू -सासऱ्यांना जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसापूर्वी बंगळुरु येथील अतुल सुभाष या अभियंत्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणी त्यांची पत्नी निकिती सिंघानिया आणि सासू -सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत आता कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे.  पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना बेंगळुरू सिटी सिव्हिल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या मृत्यूप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली होती. निकिता सिंघानियाला हरयाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली, तर तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आले. बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, तिघांनाही डिसेंबरच्या सकाळी अटक करण्यात आली आणि स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

अतुल सुभाष यांचा मृतदेह ९ डिसेंबर रोजी दक्षिण-पूर्व बंगळुरूमधील मुन्नेकोलालू येथील त्यांच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुभाषने व्हिडीओ आणि २४ पानांच्या सुसाईड नोटमध्ये असा  पत्नीविरोधात आरोप केला. विभक्त पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून आणि सतत त्रास करून आत्महत्या करण्यास भाग पाडले, असं या व्हिडीओत सांगितलं आहे. 

निकिताला जामीन मिळाल्यानंतर, अतुल सुभाषचे वकील विनय सिंह म्हणाले, "जामीन मंजूर झाला आहे. आम्ही ऑर्डर शीटची वाट पाहत आहोत. आमचा युक्तिवाद तथ्यात्मक माहिती, छळ यावर होता. सध्या सुसाईड नोट पाठवली जात आहे. फॉरेन्सिक विश्लेषणसाठी पाठवले आहे, पण अद्याप विचारात घेतलेला नाही. त्यांचा आत्महत्येचा व्हिडीओ देखील फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला आहे. त्यांचे हस्ताक्षर देखील तपासले जात आहे. आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत आहोत. आम्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहोत.

सरकारी वकील पोन्नन्ना यांनी जामिनाला विरोध केला आहे. याला आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वकील म्हणाले, "पत्नी, मेव्हणा आणि सासू हे सर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात आले होते आणि आता परवानगी देण्यात आली आहे. आम्हाला अजून सविस्तर आदेश पहायचा आहे. एकदा पाहू. चौकशी पूर्ण केल्याशिवाय त्यांना जामीन मंजूर करण्यात आला नसावा, हे सविस्तरपणे कळेल यावर खूश नाही आणि आव्हान देईन".