शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:47 IST

टूर अनिश्चित काळासाठी स्थगित; लाखो पर्यटकांचा हिरमोड

- चिन्मय काळे मुंबई : केरळमधील महापुरामुळे सर्व पर्यटन कंपन्यांनी तेथील टूर अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साडेतीन लाखाहून अधिक पर्यटकांना त्यांंची केरळ टूर रद्द करावी लागली आहे. कंपन्या त्यांना आता अन्य पर्यटनस्थळांचा पर्याय देत आहेत.केरळमधील पर्यटनाचा हंगाम जुलैनंतर सुरु होतो. जून-जुलैमधील दमदार पावसानंतर वातावरण आल्हाददायी बनल्याने आॅगस्टपासून तिथे पर्यटकांची लगबग वाढू लागते. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यातच पावसाने रुद्रावतार दाखवला. महापुरामुळे अनेक पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे कंपन्यांना तेथील टूर रद्द कराव्या लागल्या आहेत.थॉमस कूक इंडिया लिमिटेडचे भारत प्रमुख राजीव काळे म्हणाले की, सध्या केरळमधील स्थिती भीषण आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथील सर्व टूर आम्ही रद्द केल्या आहेत. या पुन्हा कधी निघतील, हे सांगता येणार नाही. तुर्तास आम्ही पर्यटकांना केरळात न जाण्याचा सल्ला देत आहोत. ज्यांचे बुकिंग झाले आहे त्यांना उटी, कोडाईकनाल, कूर्ग, म्हैसूर, बंगळुरू आदी पर्याय देत आहोत. प्रसंगी त्यांना पैसेही परत करीत आहोत.केरळमध्ये आॅगस्ट महिन्यात देशभरातून जवळपास १२ लाख पर्यटक येतात. यातील ७५ ते ८० हजार पर्यटक विदेशातील असतात. विदेशीतून येणारे अर्धे पर्यटक मुंबईतून केरळकडे जातात. देश-विदेशातील आणि महाराष्टÑातून जाणाऱ्या ३.५० ते ३.८० लाख पर्यटकांना आता केरळ टूर रद्द करावी लागला आहे.‘या महापुरामुळे १४ ते १६ पर्यटनस्थळांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने निलगिरी डोंगरांमधील ठिकाणांना फटका बसला आहे. पर्यटकांसह एकूण १० लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महापुरात मुख्यत्वे विविध ठिकाणी जाणारे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी दुभंगले आहेत. येत्या १५ दिवसात पर्यटन पूर्ववत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूवार, अ‍ॅलेप्पी, कोल्लम यासारखे उत्तर किंवा दक्षिण केरळमधील समुद्रकिनारी असलेली पर्यटनस्थळे सुरक्षित आहेत. तिथे पर्यटक आजही येऊ शकतात. केवळ हिल स्टेशन व मध्य केरळला प्रचंड फटका बसला आहे.- पी. बाल किरण, संचालक, केरळ पर्यटन

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरtourismपर्यटन