शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:47 IST

टूर अनिश्चित काळासाठी स्थगित; लाखो पर्यटकांचा हिरमोड

- चिन्मय काळे मुंबई : केरळमधील महापुरामुळे सर्व पर्यटन कंपन्यांनी तेथील टूर अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साडेतीन लाखाहून अधिक पर्यटकांना त्यांंची केरळ टूर रद्द करावी लागली आहे. कंपन्या त्यांना आता अन्य पर्यटनस्थळांचा पर्याय देत आहेत.केरळमधील पर्यटनाचा हंगाम जुलैनंतर सुरु होतो. जून-जुलैमधील दमदार पावसानंतर वातावरण आल्हाददायी बनल्याने आॅगस्टपासून तिथे पर्यटकांची लगबग वाढू लागते. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यातच पावसाने रुद्रावतार दाखवला. महापुरामुळे अनेक पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे कंपन्यांना तेथील टूर रद्द कराव्या लागल्या आहेत.थॉमस कूक इंडिया लिमिटेडचे भारत प्रमुख राजीव काळे म्हणाले की, सध्या केरळमधील स्थिती भीषण आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथील सर्व टूर आम्ही रद्द केल्या आहेत. या पुन्हा कधी निघतील, हे सांगता येणार नाही. तुर्तास आम्ही पर्यटकांना केरळात न जाण्याचा सल्ला देत आहोत. ज्यांचे बुकिंग झाले आहे त्यांना उटी, कोडाईकनाल, कूर्ग, म्हैसूर, बंगळुरू आदी पर्याय देत आहोत. प्रसंगी त्यांना पैसेही परत करीत आहोत.केरळमध्ये आॅगस्ट महिन्यात देशभरातून जवळपास १२ लाख पर्यटक येतात. यातील ७५ ते ८० हजार पर्यटक विदेशातील असतात. विदेशीतून येणारे अर्धे पर्यटक मुंबईतून केरळकडे जातात. देश-विदेशातील आणि महाराष्टÑातून जाणाऱ्या ३.५० ते ३.८० लाख पर्यटकांना आता केरळ टूर रद्द करावी लागला आहे.‘या महापुरामुळे १४ ते १६ पर्यटनस्थळांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने निलगिरी डोंगरांमधील ठिकाणांना फटका बसला आहे. पर्यटकांसह एकूण १० लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महापुरात मुख्यत्वे विविध ठिकाणी जाणारे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी दुभंगले आहेत. येत्या १५ दिवसात पर्यटन पूर्ववत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूवार, अ‍ॅलेप्पी, कोल्लम यासारखे उत्तर किंवा दक्षिण केरळमधील समुद्रकिनारी असलेली पर्यटनस्थळे सुरक्षित आहेत. तिथे पर्यटक आजही येऊ शकतात. केवळ हिल स्टेशन व मध्य केरळला प्रचंड फटका बसला आहे.- पी. बाल किरण, संचालक, केरळ पर्यटन

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरtourismपर्यटन