शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:25 IST

Census in India: जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे.

नवी दिल्ली: देशातील जनगणना पुढील वर्षीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. दर १० वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. परंतू ती आता २०२५ ला सुरु केली जाणार आहे. यामुळे त्यापुढील जनगणना ही २०३५ ला होणार आहे. 

कोरोनामुळे २०२१ ला अपेक्षित असलेली जनगणना टाळण्यात आली होती. यामुळे जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे. या जनगणनेमुळे लोकसभेच्या जागा वाढविण्याचा रस्ता देखील मोकळा होणार आहे. 

केंद्र सरकारच्या वरिष्ठ पदावरील सूत्रांनुसार पुढील जनगणनेचे आकडे २०२६ मध्ये जाहीर केले जाणार आहे. जनगणनेची माहिती नोंद करण्याची प्रक्रिया २०२५ मध्ये सुरु होणार आहे. जनगणना झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होईल. लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा, त्यांची संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. २०२८ पर्यंत सीमांकन पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. या जनगणनेमध्ये धर्म आणि वर्गाचा विचार केला जातो. परंतू यावेळी लोकांना त्यांचा पंथही विचारला जाण्याची शक्यता आहे. 

जनगणनेमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. पण यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, कर्नाटकात लिंगायत जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे वाल्मिकी, रविदासी इत्यादी अनुसूचित जातींमध्ये विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभा