शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:25 IST

Census in India: जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे.

नवी दिल्ली: देशातील जनगणना पुढील वर्षीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. दर १० वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. परंतू ती आता २०२५ ला सुरु केली जाणार आहे. यामुळे त्यापुढील जनगणना ही २०३५ ला होणार आहे. 

कोरोनामुळे २०२१ ला अपेक्षित असलेली जनगणना टाळण्यात आली होती. यामुळे जनगणनेचा १९९१, २००१, २०११ असे दर दहा वर्षांचे चक्र बदलले आहे. २०२५ ला सुरु होणारी जनगणना ही २०२६ पर्यंत चालणार आहे. या जनगणनेमुळे लोकसभेच्या जागा वाढविण्याचा रस्ता देखील मोकळा होणार आहे. 

केंद्र सरकारच्या वरिष्ठ पदावरील सूत्रांनुसार पुढील जनगणनेचे आकडे २०२६ मध्ये जाहीर केले जाणार आहे. जनगणनेची माहिती नोंद करण्याची प्रक्रिया २०२५ मध्ये सुरु होणार आहे. जनगणना झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होईल. लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा, त्यांची संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. २०२८ पर्यंत सीमांकन पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. या जनगणनेमध्ये धर्म आणि वर्गाचा विचार केला जातो. परंतू यावेळी लोकांना त्यांचा पंथही विचारला जाण्याची शक्यता आहे. 

जनगणनेमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. पण यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, कर्नाटकात लिंगायत जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे वाल्मिकी, रविदासी इत्यादी अनुसूचित जातींमध्ये विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभा