शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

संरक्षण उत्पादनात देश होणार आत्मनिर्भर; १०१ शस्त्रास्त्रांची आयात थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 04:09 IST

परकीय अवलंबित्व होणार कमी; देशी संरक्षण उद्योगांना मिळणार चालना

- निनाद देशमुख पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाची घोषणा करत संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी १०१ शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी घातली. यामुळे ही उत्पादने आता देशातच उत्पादित केली जातील. या निर्णयाचे उद्योजकांसह संरक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी देण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशी उद्योगांना संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. आयात बंद केलेल्या १०१ शस्त्रास्त्रात नौदल, वायूदल तसेच लष्कराला लागणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या पाच वर्षांत जवळपास ३ लाख कोटींच्या शस्त्रास्त्रांची कंत्राटे दिली होती. हे सर्व शस्त्रे आता देशात बनणार आहेत. यामुळे देशातला पैसा देशात राहणार असून देशी उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होणार आहे.भारतीय उद्योगांना चालना मिळणारसामरिक निर्णयामुळे संरक्षण उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल. भारतीय संरक्षण उपकरणे आणि उत्पादन उद्योगांना चालना मिळेल. देशांतर्गत उद्योगात विशेषत: एमएसएमई क्षेत्राच्या वाढीमुळे आत्मनिर्भरता वाढेल. आयातीवरील खर्च कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामुळे भारताचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठले जाईल.-बाबा कल्याणी, सीएमडी, भारत फोर्ज उद्योग समूहसंरक्षण मंत्रालयाने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असून यामुळे देशी उद्योगांना चालना मिळेल आणि परकीय अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत उत्पादन वाढेल.- निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर२०१४ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची सुरुवात केली होती. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर योजनेमुळे याला चालना मिळणार आहे. कोट्यवधींची रक्कम यामुळे वाचणार असून त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादन वाढीला मिळणार आहे.- निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरनागरी उड्डयन क्षेत्रातही हवी आत्मनिर्भरतानागरी उड्डयण क्षेत्रातही या प्रकारच्याच आत्मनिर्भरतेची गरज आहे. या साठी स्पेस, एअर फोर्स आणि आर्मी एव्हिएशन यांनी एकत्रित येऊन त्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. याचा फायदा हवाई दलाबरोबरच नागरी उड्डयन क्षेत्राला होईल.- निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग