शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण उत्पादनात देश होणार आत्मनिर्भर; १०१ शस्त्रास्त्रांची आयात थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 04:09 IST

परकीय अवलंबित्व होणार कमी; देशी संरक्षण उद्योगांना मिळणार चालना

- निनाद देशमुख पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाची घोषणा करत संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी १०१ शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी घातली. यामुळे ही उत्पादने आता देशातच उत्पादित केली जातील. या निर्णयाचे उद्योजकांसह संरक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी देण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशी उद्योगांना संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. आयात बंद केलेल्या १०१ शस्त्रास्त्रात नौदल, वायूदल तसेच लष्कराला लागणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या पाच वर्षांत जवळपास ३ लाख कोटींच्या शस्त्रास्त्रांची कंत्राटे दिली होती. हे सर्व शस्त्रे आता देशात बनणार आहेत. यामुळे देशातला पैसा देशात राहणार असून देशी उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होणार आहे.भारतीय उद्योगांना चालना मिळणारसामरिक निर्णयामुळे संरक्षण उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल. भारतीय संरक्षण उपकरणे आणि उत्पादन उद्योगांना चालना मिळेल. देशांतर्गत उद्योगात विशेषत: एमएसएमई क्षेत्राच्या वाढीमुळे आत्मनिर्भरता वाढेल. आयातीवरील खर्च कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामुळे भारताचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठले जाईल.-बाबा कल्याणी, सीएमडी, भारत फोर्ज उद्योग समूहसंरक्षण मंत्रालयाने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असून यामुळे देशी उद्योगांना चालना मिळेल आणि परकीय अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत उत्पादन वाढेल.- निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर२०१४ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची सुरुवात केली होती. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर योजनेमुळे याला चालना मिळणार आहे. कोट्यवधींची रक्कम यामुळे वाचणार असून त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादन वाढीला मिळणार आहे.- निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरनागरी उड्डयन क्षेत्रातही हवी आत्मनिर्भरतानागरी उड्डयण क्षेत्रातही या प्रकारच्याच आत्मनिर्भरतेची गरज आहे. या साठी स्पेस, एअर फोर्स आणि आर्मी एव्हिएशन यांनी एकत्रित येऊन त्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. याचा फायदा हवाई दलाबरोबरच नागरी उड्डयन क्षेत्राला होईल.- निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग