शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

संरक्षण उत्पादनात देश होणार आत्मनिर्भर; १०१ शस्त्रास्त्रांची आयात थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 04:09 IST

परकीय अवलंबित्व होणार कमी; देशी संरक्षण उद्योगांना मिळणार चालना

- निनाद देशमुख पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाची घोषणा करत संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी १०१ शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी घातली. यामुळे ही उत्पादने आता देशातच उत्पादित केली जातील. या निर्णयाचे उद्योजकांसह संरक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी देण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशी उद्योगांना संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. आयात बंद केलेल्या १०१ शस्त्रास्त्रात नौदल, वायूदल तसेच लष्कराला लागणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या पाच वर्षांत जवळपास ३ लाख कोटींच्या शस्त्रास्त्रांची कंत्राटे दिली होती. हे सर्व शस्त्रे आता देशात बनणार आहेत. यामुळे देशातला पैसा देशात राहणार असून देशी उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होणार आहे.भारतीय उद्योगांना चालना मिळणारसामरिक निर्णयामुळे संरक्षण उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल. भारतीय संरक्षण उपकरणे आणि उत्पादन उद्योगांना चालना मिळेल. देशांतर्गत उद्योगात विशेषत: एमएसएमई क्षेत्राच्या वाढीमुळे आत्मनिर्भरता वाढेल. आयातीवरील खर्च कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामुळे भारताचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठले जाईल.-बाबा कल्याणी, सीएमडी, भारत फोर्ज उद्योग समूहसंरक्षण मंत्रालयाने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असून यामुळे देशी उद्योगांना चालना मिळेल आणि परकीय अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत उत्पादन वाढेल.- निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर२०१४ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची सुरुवात केली होती. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर योजनेमुळे याला चालना मिळणार आहे. कोट्यवधींची रक्कम यामुळे वाचणार असून त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादन वाढीला मिळणार आहे.- निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरनागरी उड्डयन क्षेत्रातही हवी आत्मनिर्भरतानागरी उड्डयण क्षेत्रातही या प्रकारच्याच आत्मनिर्भरतेची गरज आहे. या साठी स्पेस, एअर फोर्स आणि आर्मी एव्हिएशन यांनी एकत्रित येऊन त्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. याचा फायदा हवाई दलाबरोबरच नागरी उड्डयन क्षेत्राला होईल.- निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग