शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मोठी घडामोड! शरद पवारांनी व्यक्त केली चिंंता; लोकशाही अन् राजकारणावर मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 10:55 IST

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला ईव्हीएमबाबत निर्वाणीचा जाब विचारण्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे

महाराष्ट्र आणि देशातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी प्रकरणात सुनावण्यात आलेल्या २ वर्षांच्या शिक्षेनंतर विरोधकांनी एकत्र मोट बांधली असून शरद पवार यांच्यासोबत चर्चा केलीय. या बैठकीत, देशातील लोकशाही, मुलभूत हक्कांवर येणारी गदा आणि भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत असल्याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. तर, व्हीएमच्या दुरुपयोगासंबंधांतील सर्व प्रकारच्या शंका-कुशंकांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी विरोधकांनी भूमिका व्यक्त केली.   

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला ईव्हीएमबाबत निर्वाणीचा जाब विचारण्याचा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत त्यावर सहमती झाली. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी नावावरुन केलेल्या टीकेप्रकरणात सूरतच्या न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावल्याबद्दलही शरद पवार यांच्यसह सर्व विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील राजकीय पक्ष, नेते आणि नागरिकांचा आवाज दाबण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे शरद पवार यांनी म्हटलं. यावेळी, राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या २ वर्षांच्या शिक्षेकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, राष्ट्रवादीचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण याप्रकरारचे असल्याचे त्यांनी म्हटले. आज प्रत्येकाला चिंता करावी लागतेय, ह्या राजकीय प्रवृत्तीचा निषेध करतो, असेही पवार यांनी म्हटले. 

आयोगाने ईव्हीएमबाबत लेखी निराकरण करावे

निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेसंबंधातील सर्व आक्षेपांचे लेखी निराकरण करावे. प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाही तर पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला. शरद पवार यांच्या ६, जनपथ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे खा. दिग्विजय सिंह, ज्येष्ठ विधिज्ञ खा. कपिल सिब्बल, ठाकरे गटाचे खा. अनिल देसाई, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, समाजवादी पक्षाचे प्रा. रामगोपाल यादव, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. याशिवाय लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही निवडणुका महाराष्ट्रातील सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला देखील लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdelhiदिल्लीRahul Gandhiराहुल गांधी