शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापित समितीतून भूपिंदरसिंग मान बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 05:54 IST

शेतकऱ्यांना साथ देण्याचा निर्धार

विकास झाडे

नवी दिल्ली : शेतीविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबरोबरच केंद्र सरकार व आंदोलक शेतकरी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित चार जणांच्या समितीतील सदस्य भूपिंदरसिंग मान यांनी समितीतून बाहेर पडत असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. आपण शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करू शकत नसल्याचे कारण सांगत मान यांनी समितीचा त्याग केला. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला गुरुवारी ५० दिवस पूर्ण झाले. 

केंद्र सरकार व शेतकरी संघटना यांच्यातील वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार जणांची समिती स्थापन केली. त्यात मान यांच्यासह अनिल घनवट, प्रमोदकुमार जोशी आणि अशोक गुलाटी यांचा समावेश आहे. मात्र, ही समिती सरकारधार्जिणी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी या समितीशी चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर केला. या सर्व पार्श्वभूमीवर मान यांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. आपण एक शेतकरी असण्याबरोबरच शेतकरी संघटनेचे नेतेही आहोत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित समितीत सदस्य म्हणून राहण्याचे तत्त्वात बसत नाही सबब या समितीचा त्याग करत आहे, असे मान यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे. मान यांच्या या निर्णयाचे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी स्वागत केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक असेल, असे संकेतही टिकेत यांनी दिले. 

कायद्याच्या प्रती जाळल्या आंदोलनाला ५० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आंदोलन देशव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, राजस्थाननंतर अन्य राज्यांतील शेतकरी सामील झाल्याने या चळवळीने देशव्यापी स्वरूप धारण केले आहे.  तिन्ही कृषी कायदे रद्द करावे आणि एमएसपीला कायदेशीर अधिकार द्यावेत या मागण्यांवर शेकरी ठाम आहेत. शेतकरी नेते डॉ. दर्शन पाल म्हणाले की, तीन कृषी कायद्यांची प्रत जाळून लोहडीचा सण साजरा करण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNew Delhiनवी दिल्ली