शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

"भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे...", केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:13 IST

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस सध्या देशाच्या अनेक राज्यांतून भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईत संपेल. या प्रवासादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक राज्यांतून जाणार आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे" असं म्हटलं आहे. 

प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेस भारताविरोधात भारतीयांना एकत्र करत आहे. काँग्रेस याला भारत जोडो म्हणतं पण त्यांचा खरा अजेंडा हा भारत तोडो असा आहे. NDA ने UPA पेक्षा कर्नाटकला 247% जास्त दिलं आहे आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. आमचं राजकारण विकासासाठी आहे. त्यांचं फक्त राजकारण, विकास विसरा!" असं प्रल्हाद जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आता ओडिशामध्ये पोहोचली आहे. ओडिशामध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला विशेष आवाहनही केलं. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मी यात्रेदरम्यान सात ते आठ तास लोकांचे ऐकतो आणि दररोज 15 मिनिटे त्यांना संबोधित करतो."

लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचं राहुल यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रा 2022-23 मध्ये देशाला एकत्र आणण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर असं सुमारे 4,000 किलोमीटर अंतर प्रवास करण्यात आला आणि हा प्रवास “द्वेष आणि अन्यायाविरुद्ध” होता. लाखोंच्या संख्येने या यात्रेत लोक सहभागी झाले होते. त्यामुळेच ही यात्रा यशस्वी झाली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा