शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

"भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे...", केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:13 IST

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस सध्या देशाच्या अनेक राज्यांतून भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईत संपेल. या प्रवासादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक राज्यांतून जाणार आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे. मात्र आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे" असं म्हटलं आहे. 

प्रल्हाद जोशी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेस भारताविरोधात भारतीयांना एकत्र करत आहे. काँग्रेस याला भारत जोडो म्हणतं पण त्यांचा खरा अजेंडा हा भारत तोडो असा आहे. NDA ने UPA पेक्षा कर्नाटकला 247% जास्त दिलं आहे आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. आमचं राजकारण विकासासाठी आहे. त्यांचं फक्त राजकारण, विकास विसरा!" असं प्रल्हाद जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आता ओडिशामध्ये पोहोचली आहे. ओडिशामध्ये पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला विशेष आवाहनही केलं. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मी यात्रेदरम्यान सात ते आठ तास लोकांचे ऐकतो आणि दररोज 15 मिनिटे त्यांना संबोधित करतो."

लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचं राहुल यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रा 2022-23 मध्ये देशाला एकत्र आणण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर असं सुमारे 4,000 किलोमीटर अंतर प्रवास करण्यात आला आणि हा प्रवास “द्वेष आणि अन्यायाविरुद्ध” होता. लाखोंच्या संख्येने या यात्रेत लोक सहभागी झाले होते. त्यामुळेच ही यात्रा यशस्वी झाली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा