शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भगवद्गीतेवरून महाभारत

By admin | Updated: December 9, 2014 03:26 IST

साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानाचे वादळ शमते ना शमते तोच गीतेवरून राजकीय महाभारत घडण्याचे स्पष्ट संकेत दिवसभराच्या घडामोडींनी दिले.

‘राष्ट्रीय गं्रथ’ घोषित करा : सुषमा स्वराज यांच्या मागणीला तीव्र विरोध 
 
नवी दिल्ली : भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रेटताच विरोधाचे तीव्र सूर उमटले आहे. साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानाचे वादळ शमते ना शमते तोच गीतेवरून राजकीय महाभारत घडण्याचे स्पष्ट संकेत दिवसभराच्या घडामोडींनी दिले. गीतेला हा असा दर्जा देणो म्हणजे देशाचे धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान गुंडाळून हिंदुराष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याची टीका त्यातून सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे मग इतर धर्मातील पवित्र ग्रंथाचे काय, असा सवालही उपस्थित झाला आहे. तशात सोमवारीच ताजमहाल कोणाचा, असा प्रश्न उपस्थित झाला. 
 
काय म्हणाल्या होत्या सुषमा स्वराज
 
रविवारी प्रेरणा महोत्सवाचे आयोजन केले होत़े या कार्यक्रमात स्वराज यांनी गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी पुढे रेटली होती़
 
जीवनातील सर्व समस्या आणि प्रश्नांची उत्तरे गीतेत आहेत़ जीवनाचे सार सांगणा:या या महान ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा मिळायला हवा़ 
 
नरेंद्र मोदी यांनी बराक ओबामा यांना गीतेची प्रत भेट देऊन एकप्रकारे गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा अनौपचारिक दर्जा दिलेला आहेच, असे स्वराज म्हणाल्या होत्या़
 
गीतेसह कुराण, पुराण, वेद, वेदांत, बायबल, गुरुग्रंथसाहेब हे सर्व धर्मग्रंथ आमच्यासाठी पवित्र आहेत़ पण लोकशाही राज्यघटना हाच राष्ट्रीय आणि पवित्र गं्रथ असायला हवा़- ममता बॅनर्जी
 
तिरुकुरल हाच भारताचा राष्ट्रीय गं्रथ बनू शकतो़ हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा. 
-एस़ रामदास, पीएमके
 
तुम्ही गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करीत 
असाल तर वेदांचे काय? उपनिषदांचे काय? भारतासारख्या बहुधार्मिक देशात एकच ग्रंथ पवित्र कसा ठरवला जाऊ शकतो? -शशी थरूर
 
आठवे आश्चर्य ताजमहाल कोणाच्या मालकीचा ?
जगातले आठवे मानवनिर्मित आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणा:या ताजमहालवर मालकी कोणाची, असा प्रश्न सोमवारी लोकसभेत उपस्थित झाला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तो त्यांचा असल्याचे तर विरोधी पक्षातील सदस्यांनी तो सर्वाचा असल्याचे उत्तर दिले. हा प्रश्न उपस्थित केला होता एआयएमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांनी. अलीकडेच आजम खान यांनी ताजमहाल ही राज्य वक्फ मंडळाची संपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.