शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लढवणार राज्यसभेची निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 21:41 IST

भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

नवी दिल्ली, दि. 25 : भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमित शहा यांच्यासह केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी  सुद्धा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. 

गुजरातमध्ये राज्यसभेसाठी तीन जागांसाठी येत्या आठ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत अमित शाह आणि स्मृती ईरानी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, मध्यप्रदेशातून राज्यसभेसाठी संपतिया उइके यांनी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे वरिष्ठ नेता जे.पी. नड्डा यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर सांगितले. 

दरम्यान, गुजरात (3), पश्चिम बंगाल (6) आणि मध्यप्रदेशमधील (1) राज्यसभेच्या दहा जागांवर सद्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील 2 आणि आंध्रप्रदेशातील एका जागेवरही राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी दिलेला राजीनामा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर व्यंकय्या नायडू यांची एक जागाही रिक्त होईल. पंरतू, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाला राज्यसभेची जागा देतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर,भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील राज्यसभेच्या तीनही जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांनी भाजपासाठी क्रॉस वोटिंग केल्यानंतर अहमद पटेल यांच्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यात भाजपाचे 123 सदस्य आहेत. राज्यसभेसाठी त्यांचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचे 56 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 2 तर जनता दल यूनायटेडचा एक सदस्य आहे. या पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसचा एक सदस्य राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. परंतू, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अतिरिक्त 11 मते मिळाली. तसेच, शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला आहे. या घटनांमुळे आता परिस्थिती बदलली आहे. काही बदल होऊ शकतो का याची चाचपणी काँग्रेस करत आहे.