शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लढवणार राज्यसभेची निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 21:41 IST

भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

नवी दिल्ली, दि. 25 : भारतीय जनता पार्टीचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमित शहा यांच्यासह केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी  सुद्धा राज्यसभेची निवडणूक लढविणार आहेत. 

गुजरातमध्ये राज्यसभेसाठी तीन जागांसाठी येत्या आठ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत अमित शाह आणि स्मृती ईरानी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, मध्यप्रदेशातून राज्यसभेसाठी संपतिया उइके यांनी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे वरिष्ठ नेता जे.पी. नड्डा यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर सांगितले. 

दरम्यान, गुजरात (3), पश्चिम बंगाल (6) आणि मध्यप्रदेशमधील (1) राज्यसभेच्या दहा जागांवर सद्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील 2 आणि आंध्रप्रदेशातील एका जागेवरही राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी दिलेला राजीनामा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर व्यंकय्या नायडू यांची एक जागाही रिक्त होईल. पंरतू, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाला राज्यसभेची जागा देतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर,भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील राज्यसभेच्या तीनही जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या 11 आमदारांनी भाजपासाठी क्रॉस वोटिंग केल्यानंतर अहमद पटेल यांच्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यात भाजपाचे 123 सदस्य आहेत. राज्यसभेसाठी त्यांचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचे 56 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 2 तर जनता दल यूनायटेडचा एक सदस्य आहे. या पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसचा एक सदस्य राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. परंतू, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अतिरिक्त 11 मते मिळाली. तसेच, शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला आहे. या घटनांमुळे आता परिस्थिती बदलली आहे. काही बदल होऊ शकतो का याची चाचपणी काँग्रेस करत आहे.