शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कर बुडवला असेल, तर सावधान! १०० अधिकाऱ्यांच्या टीमला ८ लाख काेटी रुपयांचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 06:25 IST

करवसुलीच्या मागील नोंदीवरून असे दिसून येते की, विभागाचे अधिकारी केवळ १० टक्के इतकीच  थकबाकी वसूल करू शकलेले आहेत

हरीश गुप्ता नवी दिल्ली : ३१ मार्च २०२३ पूर्वीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुमारे आठ लाख कोटी रुपयांची आयकर थकबाकी वसूल करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय सध्या अतिरिक्त काम करीत आहे. आयकर विभागाची एकूण थकबाकी १९ लाख कोटी रुपये असली तरी सरकारने या रकमेच्या किमान ४० टक्के वसूल करण्याचे लक्ष्य सध्या ठेवले आहे. मोदी सरकारने पुढील आर्थिक वर्षात देशभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी दहा लाख कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर अर्थ मंत्रालयाला जलद गतीने थकबाकी वसूल करण्यास सांगितले आहे. 

करवसुलीच्या मागील नोंदीवरून असे दिसून येते की, विभागाचे अधिकारी केवळ १० टक्के इतकीच  थकबाकी वसूल करू शकलेले आहेत. वसुलीची ही रक्कम आता ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. याच उद्देशाने करदात्यांनी दाखल केलेल्या अपिलांचा निपटारा करण्यासाठी आणि मोठी रक्कम थकीत असलेल्यांकडून वसूल करण्यासाठी जवळपास १००सह आयुक्त दर्जाचे अधिकारी तैनात केले जातील. त्यानुसार विभागाने तयारी सुरु केली आहे. 

करदात्यांना असे वाटते की, २०२१-२२पर्यंतचे १४.१९ लाख कोटी रुपये परत करावेत. गत पाच वर्षांत करवसुवलीसंदर्भात ५,९८,४४८ प्रकरणे दाखल आहेत. यातील ४,४०,१५३ अपिलांचे पाच वर्षांत निराकरण करण्यात आले आहे. मात्र, दोन लाखांपेक्षा अधिक अपील अद्याप आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. वाटाघाटीतून हा प्रश्न सोडविण्याचा  केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. परंतु आयटी अधिकारी यासाठी इच्छुक नाहीत, असे दिसत आहे. कारण, करदात्यांना मदत केल्याप्रकरणी तपास यंत्रणांकडून भविष्यात त्यांचीच  विचारपूस होऊ शकते, अशी भीती विभागातील आयटी अधिकाऱ्यांना वाटते. 

कर थकबाकी का वाढत आहे? प्रलंबित असलेले खटले, कंपन्यांचे लिक्विडेशन, विविध पद्धतींचा वापर करूनही शोधता न येणारे करदाते यामुळे कर थकबाकी वाढत आहे. न्यायालये किंवा न्यायाधिकरणांनी स्थगिती दिलेली प्रकरणेही आहेत. विरोधाभास असा आहे की, आयटी विभागातही अनेक अपील आहेत. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCentral Governmentकेंद्र सरकार