शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कर बुडवला असेल, तर सावधान! १०० अधिकाऱ्यांच्या टीमला ८ लाख काेटी रुपयांचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 06:25 IST

करवसुलीच्या मागील नोंदीवरून असे दिसून येते की, विभागाचे अधिकारी केवळ १० टक्के इतकीच  थकबाकी वसूल करू शकलेले आहेत

हरीश गुप्ता नवी दिल्ली : ३१ मार्च २०२३ पूर्वीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुमारे आठ लाख कोटी रुपयांची आयकर थकबाकी वसूल करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालय सध्या अतिरिक्त काम करीत आहे. आयकर विभागाची एकूण थकबाकी १९ लाख कोटी रुपये असली तरी सरकारने या रकमेच्या किमान ४० टक्के वसूल करण्याचे लक्ष्य सध्या ठेवले आहे. मोदी सरकारने पुढील आर्थिक वर्षात देशभरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी दहा लाख कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तर अर्थ मंत्रालयाला जलद गतीने थकबाकी वसूल करण्यास सांगितले आहे. 

करवसुलीच्या मागील नोंदीवरून असे दिसून येते की, विभागाचे अधिकारी केवळ १० टक्के इतकीच  थकबाकी वसूल करू शकलेले आहेत. वसुलीची ही रक्कम आता ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. याच उद्देशाने करदात्यांनी दाखल केलेल्या अपिलांचा निपटारा करण्यासाठी आणि मोठी रक्कम थकीत असलेल्यांकडून वसूल करण्यासाठी जवळपास १००सह आयुक्त दर्जाचे अधिकारी तैनात केले जातील. त्यानुसार विभागाने तयारी सुरु केली आहे. 

करदात्यांना असे वाटते की, २०२१-२२पर्यंतचे १४.१९ लाख कोटी रुपये परत करावेत. गत पाच वर्षांत करवसुवलीसंदर्भात ५,९८,४४८ प्रकरणे दाखल आहेत. यातील ४,४०,१५३ अपिलांचे पाच वर्षांत निराकरण करण्यात आले आहे. मात्र, दोन लाखांपेक्षा अधिक अपील अद्याप आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. वाटाघाटीतून हा प्रश्न सोडविण्याचा  केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. परंतु आयटी अधिकारी यासाठी इच्छुक नाहीत, असे दिसत आहे. कारण, करदात्यांना मदत केल्याप्रकरणी तपास यंत्रणांकडून भविष्यात त्यांचीच  विचारपूस होऊ शकते, अशी भीती विभागातील आयटी अधिकाऱ्यांना वाटते. 

कर थकबाकी का वाढत आहे? प्रलंबित असलेले खटले, कंपन्यांचे लिक्विडेशन, विविध पद्धतींचा वापर करूनही शोधता न येणारे करदाते यामुळे कर थकबाकी वाढत आहे. न्यायालये किंवा न्यायाधिकरणांनी स्थगिती दिलेली प्रकरणेही आहेत. विरोधाभास असा आहे की, आयटी विभागातही अनेक अपील आहेत. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCentral Governmentकेंद्र सरकार