शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:33 IST

आरबीसीनं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत जल्लोषाचं वातावरण होते. हजारो चाहते सकाळपासून चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते.

बंगळुरू - आयपीएल २०२५ चा खिताब जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) टीम बुधवारी कर्नाटकातील बंगळुरूत पोहचली. याठिकाणी एअरपोर्टबाहेर हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर विजयी टीम मुख्यमंत्री सिद्धरम्मैया यांच्या भेटीला विधानसभेत पोहचली. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा होता. त्याआधी विजयी परेड निघाली परंतु त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त जखमी झालेत. या सोहळ्यावरून कर्नाटकात राजकारण चांगलेच पेटले असून विरोधी भाजपाने सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांनी म्हटलं की, मी आत्ताच पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी बोललो. सध्या या घटनेतील मृतांचा आकडा समोर आला नाही. आम्ही लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर खेळाडूचा सत्कार सोहळाही १० मिनिटांत संपवण्यात आला. आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आरसीबी आणि कर्नाटकावर गर्व आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा विजय मिळाला परंतु मी बंगळुरू आणि कर्नाटकातील लोकांची माफी मागतो. आम्ही ही विजयी मिरवणूक काढली त्यात गर्दी नियंत्रणाबाहेर गेली असं त्यांनी सांगितले. तर ही जी घटना घडली त्याला सरकार जबाबदार आहे. लोक किती जमणार, काय काळजी घ्यायला हवी हे माहिती नाही. राज्य सरकारच्या अपयशामुळे आज लोक मृत्युमुखी पडले असं भाजपा आमदार नारायणस्वामी यांनी म्हटलं. 

जल्लोषात पसरला शोक

आरबीसीनं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत जल्लोषाचं वातावरण होते. हजारो चाहते सकाळपासून चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. परंतु जसंजसं वेळ होत गेला तसे इथली गर्दी जास्त वाढली. त्यानंतर लोकांनी दिसेल तिथून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत लोक झाडे, भिंती ओलांडून स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यात राज्य सरकारला अपयश आले. त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यात अनेक जण चेंगराचेंगरीत दगावले आणि जखमी झाले.

दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ३० ते ३२ हजार इतकी आहे. पण स्टेडियमबाहेर लाखोंची गर्दी झाली. यावेळी गर्दीला आवरणं सुरक्षारक्षकांनाही कठीण होऊन बसलं. गर्दी इतकी होती चक्क स्टेडियमबाहेरील वाहनांवर लोक चढले. वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला स्टेडियममध्ये सुरू असलेला विजयी समारंभ ३० मिनिटांत संपवण्याचे आदेश दिले मात्र घडलेल्या प्रकारामुळे आरसीबीच्या विजयी जल्लोषात दु:खाचं विरजन पडले. 

टॅग्स :IPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर