शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! रुग्णालयाच्या शवागारात कुजून गेले २ रुग्णांचे मृतदेह; १६ महिन्यांपूर्वी झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 10:33 IST

जुलै २०२० मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह अंत्यसंस्काराविना शवागारात पडून; कुटुंबियांना जबर धक्का

बंगळुरू: कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात कुजून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २ जुलै २०२० रोजी मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या धार्मिक रितीरिवाजानुसार श्राद्धाचे विधी केले. मात्र त्यानंचर १६ महिन्यांनी आपल्या आप्तांवर अंत्यसंस्कारच झाले नसल्याची माहिती दोन्ही कुटुंबांना समजली आणि त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. 

कोरोनामुळे ६७ वर्षीय मुनिराजु यांचा २ जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. बंगळुरूतील ईएसआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी देशात कोरोनाची पहिली लाट होती. मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जात नव्हते. त्यामुळे मुनिराजुच्या कुटुंबियांनी बंगळुरू महापालिकेला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. मात्र मुनिराजु यांच्यावर अंत्यसंस्कारच झाले नसल्याची, त्यांचा मृतदेह शवागारात कुजल्याची माहिती समजल्यावर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

जवळपास असाच काहीसा प्रकार ४० वर्षांच्या दुर्गा यांच्यासोबतही घडला. त्यांचा मृत्यूदेखील २ जुलै २०२० रोजी झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र मुनिराजु आणि दुर्गा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेच नव्हते. त्यांचे मृतदेह शवागारातच होते. तब्बल १६ महिने त्यांचे मृतदेह शवागारात राहिले. ते अक्षरश: कुजून गेले. आपल्या कुटुंबातील सदस्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत, अशी कुटुंबातील इतर सदस्यांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी श्राद्धाचे विधी उरकून घेतले होते.

दोघांचे मृतदेह शवागारात असल्याची माहिती शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ माजली. दोन मृतदेह तब्बल १६ महिन्यांपासून शवागारात कसे राहिले, ते सध्या कोणते स्थितीत आहेत, त्यांची अवस्था काय, याबद्दल अद्याप रुग्णालयानं कोणतीही माहिती दिलेली नाही. रुग्णालयाचा एकही अधिकारी याबद्दल बोलायला तयार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या