शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

घर घेताय, २० मार्चपर्यंतच मिळणार अडीच लाख रूपये; तातडीनं करावं लागेल 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:49 IST

२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरी, ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे.

नवी दि्ल्ली - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंतच लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची मोठी धावपळ सुरू आहे. परंतु, ही योजना बंद होणार असल्याने घरकुलाचे स्वप्न पाहणारे अनेकजण वंचित राहणार आहेत.

२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरी, ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सबसिडी मिळू लागल्याने जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजही अनेकजण उत्सुक आहेत. परंतु, ही योजनाच मार्चअखेरीस संपणार असल्याने या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

२० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावाला मिळणार मान्यता

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी रितसर प्रस्ताव शासनाकडे सादर करणे गरजेचे आहे. २० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कोणाला कशी मिळते सबसिडी

सहा लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर ६.५ चे क्रेडिट लिंक्ड सबसिडी आहे. १२ लाख उत्पन्नावर ९ लाखांच्या कर्जावर ४ टक्के व्याज सबसिडी, १८ लाख उत्पन्नात १२ लाखांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सबसिडी मिळू शकते.

योजना सुरूच राहायला हवी

पंतप्रधान आवास योजनेतून मिळणाऱ्या सबसिडीचा गरजू नागरिकांना मोठा लाभ होतो. ही योजना बंद झाली तर अनेकांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान होऊ नये म्हणून ही योजना गरजूंसाठी सुरू राहणे गरजेचे आहे. - सुजित सोनवणे

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेमुळे अनेकांनी घरकुलाचे प्रस्ताव प्रस्तावित केले आहेत. गरजूंसाठी महत्त्वाची असलेली योजना शासनाने बंद करू नये. - कैलास टेकाळे

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना