शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

घर घेताय, २० मार्चपर्यंतच मिळणार अडीच लाख रूपये; तातडीनं करावं लागेल 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:49 IST

२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरी, ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे.

नवी दि्ल्ली - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंतच लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची मोठी धावपळ सुरू आहे. परंतु, ही योजना बंद होणार असल्याने घरकुलाचे स्वप्न पाहणारे अनेकजण वंचित राहणार आहेत.

२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरी, ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सबसिडी मिळू लागल्याने जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजही अनेकजण उत्सुक आहेत. परंतु, ही योजनाच मार्चअखेरीस संपणार असल्याने या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

२० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावाला मिळणार मान्यता

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी रितसर प्रस्ताव शासनाकडे सादर करणे गरजेचे आहे. २० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कोणाला कशी मिळते सबसिडी

सहा लाख रूपये वार्षिक उत्पन्नावर ६.५ चे क्रेडिट लिंक्ड सबसिडी आहे. १२ लाख उत्पन्नावर ९ लाखांच्या कर्जावर ४ टक्के व्याज सबसिडी, १८ लाख उत्पन्नात १२ लाखांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सबसिडी मिळू शकते.

योजना सुरूच राहायला हवी

पंतप्रधान आवास योजनेतून मिळणाऱ्या सबसिडीचा गरजू नागरिकांना मोठा लाभ होतो. ही योजना बंद झाली तर अनेकांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान होऊ नये म्हणून ही योजना गरजूंसाठी सुरू राहणे गरजेचे आहे. - सुजित सोनवणे

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेमुळे अनेकांनी घरकुलाचे प्रस्ताव प्रस्तावित केले आहेत. गरजूंसाठी महत्त्वाची असलेली योजना शासनाने बंद करू नये. - कैलास टेकाळे

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना