शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

‘बेजबाबदार’ म्हटल्याने भडकले श्री श्री रविशंकर

By admin | Updated: April 21, 2017 02:02 IST

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षी अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विश्व संस्कती महोत्सवामुळे यमुना नदीपात्राची झालेली हानी भरून देण्यावरून या संस्थेचे

नवी दिल्ली: ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षी अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विश्व संस्कती महोत्सवामुळे यमुना नदीपात्राची झालेली हानी भरून देण्यावरून या संस्थेचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) यांच्यात गुरुवारी शाब्दिक खडाजंगी झाली.न्यायाधिकरणाने ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ला बेजबाबदार म्हटल्यानंतर रविशंकर यांनी यमुनेच्या पावित्र्याची व स्वच्छतेची एवढी काळजी होती तर मुळात कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशाला,असा सवाल उपस्थित केला.दिल्ली प्रशासन आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिल्यानंतर ऐनवेळी हे प्रकरण आले तेव्हा ‘एनजीटी’नेही कार्यक्रमाला नाईलाजाने सशर्त परवानगी दिली होती. नदीपात्राची जी हानी होईल त्याची भरपाई करण्याचे वचन घेऊन अंतरिम भरपाई म्हणून पाच कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली होती.कार्यक्रम उरकल्यावर नदीपात्राच्या झालेल्या हानीचा अंदाज घेऊन ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी करव्या लागणाऱ्या संभाव्य खर्चाचा अदमास करण्यासाठी ‘एनजीटी’ने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने १३.२९ कोटी रुपये खर्चाचा अंदाज दिला व कार्यक्रमामुळे नदीपात्राची हानी झाल्याचाही निष्कर्ष काढला. समितीचा हा अहवाल गेल्या महिन्यात न्यायाधिकरणाकडे सादर झाला.कार्यक्रमामुळे नदीपात्राची कोणतीही हानी झालेली नाही व हे आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान आहे, अशी भूमिका ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने घेतली. स्वत: श्री श्री रविशंकर असेही म्हणाले की, यमुनेची आणि पर्यावरणाची एवढी काळजी होती तर मुळात परवानगीच द्यायची नव्हती. पण तुम्ही ती दिलीत त्यामुळे नदीपात्राची हानी झालीच असेल तर त्याबद्दल ज्यांनी परवानगी दिली, त्यांना दंड करावा.मूळ याचिकाकर्त्याने ही विधाने न्यायाधिकरणाच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्यायपीठावरील सदस्यांनी ही विधाने धक्कादायक असल्याचे म्हटले व आर्ट आॅफ लिव्हिंग किंवा रविशंकर यांचा नावानिशी उल्लेख न करता असेही तोडी भाष्य केले की, तुम्हाला जबाबदारीचे काही भान नाही. मनाला येईल ते बोलण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, असे समजता की काय?याची रीतसर दखल घेता यावी यासाठी याचिकाकर्त्याने औपचारिक अर्ज करावा, असे सांगून न्यायाधिकरणाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)