शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘बेजबाबदार’ म्हटल्याने भडकले श्री श्री रविशंकर

By admin | Updated: April 21, 2017 02:02 IST

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षी अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विश्व संस्कती महोत्सवामुळे यमुना नदीपात्राची झालेली हानी भरून देण्यावरून या संस्थेचे

नवी दिल्ली: ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने गेल्या वर्षी अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विश्व संस्कती महोत्सवामुळे यमुना नदीपात्राची झालेली हानी भरून देण्यावरून या संस्थेचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) यांच्यात गुरुवारी शाब्दिक खडाजंगी झाली.न्यायाधिकरणाने ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ला बेजबाबदार म्हटल्यानंतर रविशंकर यांनी यमुनेच्या पावित्र्याची व स्वच्छतेची एवढी काळजी होती तर मुळात कार्यक्रमाला परवानगी दिलीच कशाला,असा सवाल उपस्थित केला.दिल्ली प्रशासन आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिल्यानंतर ऐनवेळी हे प्रकरण आले तेव्हा ‘एनजीटी’नेही कार्यक्रमाला नाईलाजाने सशर्त परवानगी दिली होती. नदीपात्राची जी हानी होईल त्याची भरपाई करण्याचे वचन घेऊन अंतरिम भरपाई म्हणून पाच कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली होती.कार्यक्रम उरकल्यावर नदीपात्राच्या झालेल्या हानीचा अंदाज घेऊन ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी करव्या लागणाऱ्या संभाव्य खर्चाचा अदमास करण्यासाठी ‘एनजीटी’ने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. या समितीने १३.२९ कोटी रुपये खर्चाचा अंदाज दिला व कार्यक्रमामुळे नदीपात्राची हानी झाल्याचाही निष्कर्ष काढला. समितीचा हा अहवाल गेल्या महिन्यात न्यायाधिकरणाकडे सादर झाला.कार्यक्रमामुळे नदीपात्राची कोणतीही हानी झालेली नाही व हे आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान आहे, अशी भूमिका ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ने घेतली. स्वत: श्री श्री रविशंकर असेही म्हणाले की, यमुनेची आणि पर्यावरणाची एवढी काळजी होती तर मुळात परवानगीच द्यायची नव्हती. पण तुम्ही ती दिलीत त्यामुळे नदीपात्राची हानी झालीच असेल तर त्याबद्दल ज्यांनी परवानगी दिली, त्यांना दंड करावा.मूळ याचिकाकर्त्याने ही विधाने न्यायाधिकरणाच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर न्यायपीठावरील सदस्यांनी ही विधाने धक्कादायक असल्याचे म्हटले व आर्ट आॅफ लिव्हिंग किंवा रविशंकर यांचा नावानिशी उल्लेख न करता असेही तोडी भाष्य केले की, तुम्हाला जबाबदारीचे काही भान नाही. मनाला येईल ते बोलण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, असे समजता की काय?याची रीतसर दखल घेता यावी यासाठी याचिकाकर्त्याने औपचारिक अर्ज करावा, असे सांगून न्यायाधिकरणाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)