शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:49 IST

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल

गाझियाबाद: भारतीय हवाई दलानं बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याला पाकिस्ताननं दिलेल्या प्रत्युत्तरावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सवाल उपस्थित केला आहे. भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले होते. मग पाकिस्ताननं जैशच्या वतीनं भारताला प्रत्युत्तर दिलं का, असा प्रश्न स्वराज यांनी विचारला. आमच्या हवाई दलानं एअर स्ट्राइक करताना त्यांच्या नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यांच्या सैन्यावरही हल्ला करण्यात आला नाही. मग पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी हल्ला का केला? त्यांनी जैशच्या वतीनं प्रत्युत्तर दिलं का?, असे प्रश्न स्वराज यांना पाकिस्तानला विचारले आहेत. त्या भाजपाच्या गाझियाबादमधील संकल्प सभेत बोलत होत्या. 'पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला. आपण युद्ध करू, अशी भीती पाकिस्तानला होती. त्यांनी मदतीसाठी अनेकांना फोन केले. भेटीगाठी घेतल्या. पण आपण एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र आहोत. त्यामुळे आपण परिस्थिती बिघडू दिली नाही. मात्र पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास आम्ही शांत बसणार नाही,' असा अप्रत्यक्ष इशारा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. गाझियाबादमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या प्रचारसभेला आलेल्या स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेला एअर स्ट्राइकचा उल्लेख करत स्वराज यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. '2008 मध्ये देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तत्कालीन सरकारनं आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा घ्यायला हवा होता. पाकिस्तानला एकाकी पाडायला हवं होतं. मात्र त्यांनी संधी गमावली,' अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तान