शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:49 IST

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल

गाझियाबाद: भारतीय हवाई दलानं बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याला पाकिस्ताननं दिलेल्या प्रत्युत्तरावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सवाल उपस्थित केला आहे. भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले होते. मग पाकिस्ताननं जैशच्या वतीनं भारताला प्रत्युत्तर दिलं का, असा प्रश्न स्वराज यांनी विचारला. आमच्या हवाई दलानं एअर स्ट्राइक करताना त्यांच्या नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यांच्या सैन्यावरही हल्ला करण्यात आला नाही. मग पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी हल्ला का केला? त्यांनी जैशच्या वतीनं प्रत्युत्तर दिलं का?, असे प्रश्न स्वराज यांना पाकिस्तानला विचारले आहेत. त्या भाजपाच्या गाझियाबादमधील संकल्प सभेत बोलत होत्या. 'पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला. आपण युद्ध करू, अशी भीती पाकिस्तानला होती. त्यांनी मदतीसाठी अनेकांना फोन केले. भेटीगाठी घेतल्या. पण आपण एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र आहोत. त्यामुळे आपण परिस्थिती बिघडू दिली नाही. मात्र पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास आम्ही शांत बसणार नाही,' असा अप्रत्यक्ष इशारा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. गाझियाबादमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या प्रचारसभेला आलेल्या स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेला एअर स्ट्राइकचा उल्लेख करत स्वराज यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. '2008 मध्ये देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तत्कालीन सरकारनं आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा घ्यायला हवा होता. पाकिस्तानला एकाकी पाडायला हवं होतं. मात्र त्यांनी संधी गमावली,' अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तान