शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:49 IST

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल

गाझियाबाद: भारतीय हवाई दलानं बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याला पाकिस्ताननं दिलेल्या प्रत्युत्तरावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सवाल उपस्थित केला आहे. भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले होते. मग पाकिस्ताननं जैशच्या वतीनं भारताला प्रत्युत्तर दिलं का, असा प्रश्न स्वराज यांनी विचारला. आमच्या हवाई दलानं एअर स्ट्राइक करताना त्यांच्या नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यांच्या सैन्यावरही हल्ला करण्यात आला नाही. मग पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी हल्ला का केला? त्यांनी जैशच्या वतीनं प्रत्युत्तर दिलं का?, असे प्रश्न स्वराज यांना पाकिस्तानला विचारले आहेत. त्या भाजपाच्या गाझियाबादमधील संकल्प सभेत बोलत होत्या. 'पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला. आपण युद्ध करू, अशी भीती पाकिस्तानला होती. त्यांनी मदतीसाठी अनेकांना फोन केले. भेटीगाठी घेतल्या. पण आपण एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र आहोत. त्यामुळे आपण परिस्थिती बिघडू दिली नाही. मात्र पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास आम्ही शांत बसणार नाही,' असा अप्रत्यक्ष इशारा स्वराज यांनी पाकिस्तानला दिला. गाझियाबादमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या प्रचारसभेला आलेल्या स्वराज यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेला एअर स्ट्राइकचा उल्लेख करत स्वराज यांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. '2008 मध्ये देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी तत्कालीन सरकारनं आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा घ्यायला हवा होता. पाकिस्तानला एकाकी पाडायला हवं होतं. मात्र त्यांनी संधी गमावली,' अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तान