शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

एखाद्याच्या भूमिकेशी असहमत असतानाही उदारमतवादी राहावे- रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 21:03 IST

भारतीय निवडणूक आयोग आणि सर्व मतदारांना राष्ट्रीय मतदाता दिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो, असं वक्तव्य रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.

नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोग आणि सर्व मतदारांना राष्ट्रीय मतदाता दिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो, असं वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. देशातील प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहून संविधानाचा आदर करत मतदान करावे व मतदानासाठी इतरांनाही प्रेरित करावे. एखाद्याच्या भूमिकेशी असहमत असतानाही उदारमतवादी राहावे, असंही कोविंद म्हणाले आहेत. देशाच्या 69 प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राष्ट्रपतींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.  स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या सर्व शहिदांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. लोकशाहीच्या मूल्यांना मी नमन करतो. भारताचे नागरिक हे फक्त प्रजासत्ताक दिनाचे निर्माते नव्हे, तर आधारस्तंभ आहेत. प्रत्येक नागरिक लोकशाहीला ताकद देतो. देशातील प्रत्येक डॉक्टर, शेतकरी, पोलीस, जवान, नर्स, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, शास्त्रज्ञ, अभियंता, ज्येष्ठ नागरिक, तरुण, लहान मुलं भारत देश घडवण्यासाठी नवनवी स्वप्ने पाहत आहेत, असंही कोविंद म्हणाले आहेत. भारताला स्वातंत्र्य हे कठीण संघर्षानंतर मिळालं आहे. या संग्रामात लाखो लोकांनी सहभाग घेतला होता. त्या जवानांनी देशासाठी स्वतः सर्वस्व अर्पण केलं आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हे जवान देशासाठी झगडत राहिले. संविधान बनवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. संविधान बनवणा-यांना दूरदर्शी विचार केला होता. त्यामुळे आपल्याला प्रजासत्ताक दिन वारशात मिळाला आहे. राष्ट्र निर्माणासाठी छोट्या छोट्या अभियानांना जोडलं गेलं आहे. देशातील समाजात चांगल्या संस्कारांची पायाभरणी करणं आणि समाजातील अंधश्रद्धा, असमानता मिटवणं हेसुद्धा राष्ट्र निर्माणातील महत्त्वाचं कार्य आहे.देशात मुलींनाही मुलांसारखी शिक्षा, स्वास्थ्य आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. समाजानं आमच्या मुलींचा आवाज ऐकला पाहिजे, परिवर्तनाच्या या हाकेला आपण  प्रतिसाद दिला पाहिजे. देशातील 60 टक्क्यांहून अधिक नागरिक हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांच्यावर भारताचं भवितव्य निर्भर आहे. देशातील साक्षरतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता शिक्षणाला आणखी चालना देण्याची गरज आहे. 21व्या शतकातल्या डिजिटल अर्थव्यवस्था, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यांसारख्या आव्हानांना समर्थपणे पेलण्याची गरज आहे. देशातील खाद्यान्न उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परंतु अद्यापही कुपोषण दूर झालेलं नाही. प्रत्येक मुलांच्या ताटात आवश्यक पोषक तत्त्व उपलब्ध करून देण्याचं सरकारपुढे आव्हान आहे. आम्ही आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. अनुशासन आणि नैतिक संस्थांमुळेच एक सदृढ राष्ट्र निर्माण होतं.भारताच्या राष्ट्र निर्माणाच्या अभियानाचा जगातील प्रगतीत योगदान देणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. 2020 रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनाला 70 वर्षं पूर्ण होतील, तर 2022मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्तानं आनंद साजरा केला जाईल. मागासवर्गीयांना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरात बरोबरीत आणणं हेच लोकशाहीच्या यशाचं गमक आहे. गरिबीच्या अभिशापाला कमी करण्याची गरज आहे. भारताला विकसित देश बनवणं हे आपलं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढे जातो आहोत, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद