शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सावधान ! या तीन राज्यांमध्ये घुसलेत दहशतवादी

By admin | Updated: March 21, 2017 14:11 IST

भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे.

 ऑनलाइन  लोकमत

कोलकाता, दि. 21 - भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे. या अहवालानुसार, 2015च्या तुलनेत 2016मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात  हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेच्या दहशतवाद्यांची घुसखोरी तीनपट अधिक संख्येने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
ऑक्टोबर 2014 मध्ये बर्दवान जिल्ह्यातील खागरागडमध्ये झालेल्या स्फोटाचे संबंध जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश संघटनेशी मिळतेजुळते असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे, त्यामुळे बांगलादेशकडून देण्यात आलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेचे 2 हजारहून अधिक दहशतवादी या तिन्ही राज्यांमध्ये घुसल्याचे, या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील जवळपास 720 बंगालच्या सीमेवर आणि उर्वरित 1,290 संशयित आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, अहवालासंदर्भात प.बंगाल सरकारच्या अधिका-यांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र संशयित दहशतवाद्यांची संख्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या आसपास असली तरी समस्या आहेच कारण गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, 2014 मध्ये 800 आणि 2015 मध्ये 659 जणांनी घुसखोरी केली आहे. यामुळे अहवालाची सत्यता पडताळून पाहत असल्याची माहिती येथील गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. तर, आसाम पोलिसांनी  चिंता व्यक्त केली आहे.  आसाममध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यात आसाममध्ये 'जमाल उल मुजाहिद्दीन बांगलादेश' (जेएमबी) या दहशवादी संघटनेच्या 54 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि आमदारांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लव भट्टाचार्य यांनी दिली.
 
दरम्यान, जेएमबीचा सेक्रेटरी इफ्तादूर रहमान हा 12 जानेवारी रोजी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आला असून पश्चिम बंगालमधील अनेकांशी संपर्क साधून आहे. तो दिल्लीलाही जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इफ्तादूरचे खरे नाव सज्जाद हुसैन आहे. 18 जानेवारी रोजी मायमेनसिंह जिल्ह्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत आसाम, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीतील काही जण आणि जेएमबी व एयूजेआयचे दहशतवादी सहभागी झाले होते.