शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! या तीन राज्यांमध्ये घुसलेत दहशतवादी

By admin | Updated: March 21, 2017 14:11 IST

भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे.

 ऑनलाइन  लोकमत

कोलकाता, दि. 21 - भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे. या अहवालानुसार, 2015च्या तुलनेत 2016मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात  हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेच्या दहशतवाद्यांची घुसखोरी तीनपट अधिक संख्येने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
ऑक्टोबर 2014 मध्ये बर्दवान जिल्ह्यातील खागरागडमध्ये झालेल्या स्फोटाचे संबंध जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश संघटनेशी मिळतेजुळते असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे, त्यामुळे बांगलादेशकडून देण्यात आलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेचे 2 हजारहून अधिक दहशतवादी या तिन्ही राज्यांमध्ये घुसल्याचे, या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील जवळपास 720 बंगालच्या सीमेवर आणि उर्वरित 1,290 संशयित आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, अहवालासंदर्भात प.बंगाल सरकारच्या अधिका-यांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र संशयित दहशतवाद्यांची संख्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या आसपास असली तरी समस्या आहेच कारण गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, 2014 मध्ये 800 आणि 2015 मध्ये 659 जणांनी घुसखोरी केली आहे. यामुळे अहवालाची सत्यता पडताळून पाहत असल्याची माहिती येथील गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. तर, आसाम पोलिसांनी  चिंता व्यक्त केली आहे.  आसाममध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यात आसाममध्ये 'जमाल उल मुजाहिद्दीन बांगलादेश' (जेएमबी) या दहशवादी संघटनेच्या 54 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि आमदारांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लव भट्टाचार्य यांनी दिली.
 
दरम्यान, जेएमबीचा सेक्रेटरी इफ्तादूर रहमान हा 12 जानेवारी रोजी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आला असून पश्चिम बंगालमधील अनेकांशी संपर्क साधून आहे. तो दिल्लीलाही जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इफ्तादूरचे खरे नाव सज्जाद हुसैन आहे. 18 जानेवारी रोजी मायमेनसिंह जिल्ह्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत आसाम, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीतील काही जण आणि जेएमबी व एयूजेआयचे दहशतवादी सहभागी झाले होते.