शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

बावनथडी

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

प्रकल्पाने हिरावला आमचा रोजगार

प्रकल्पाने हिरावला आमचा रोजगार
बावनथडी प्रकल्पग्रस्तांची व्यथा : ५ महिलांचे आमरण तर १५ नागरिकांचे साखळी उपोषण
गणेश खवसे ० नागपूर
गाव प्रकल्पात गेले अन् सुखी संसाराला जणू दृष्टच लागली. प्रकल्पासाठी शेती अधिग्रहित केली, घरांवर बुलडोझर चालले. नवीन ठिकाणी गावांचे पुनर्वसन केले. परंतु, तेथेही समस्यांनी प्रकल्पग्रस्तांना घेरले. रोजगार हिरावला आणि उपाशी राहण्याची वेळ आली. या समस्यांना वाचा फुटावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांपैकी ५ महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत १५ प्रकल्पग्रस्त साखळी उपोषण करीत आहे. मात्र त्यांच्या समस्यांची दखल घ्यायला तेथे कुणीच फिरकले नाही, हे वास्तव आहे.
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातील आठ गावांसाठी बावनथडी प्रकल्प जणू डोकेदुखीच ठरला. १९७५ च्या दरसूचीनुसार या प्रकल्पाची किंमत २३.४७ कोटी एवढी होती. तिसऱ्या दरसूचीनुसार तो ५६१.३६ कोटी तर २००८-०९ च्या चतुर्थ दरसूचीनुसार हा प्रकल्प १४०७.१९ कोटी रुपयांवर गेला. या प्रकल्पाने नागपूर जिल्ह्यातील पुसदा, चिकनापूर, पिंडकेपार, मुरझड व सीतेपार (टोला) ही पाच गावे तर भंडारा जिल्ह्यातील सीतेकसा, सुसुरडोह व कमकासूर ही तीन गावे बाधित झाली. या आठ गावातील एकूण ७५६ कुटुंबापैकी ७२० कुटुंबाचे स्थलांतरण पुनर्वसित ठिकाणी झाले. मात्र तेथे नागरी सुविधांचा अभाव आहे.
पुनर्वसन ठिकाणी रोजगाराची साधने नाही. अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा अत्यल्प मोबदला दिला. याविरोधात जनसमस्या अन्यायग्रस्त समितीच्या माध्यमातून सारजा उईके, जानू शेंदरे, रत्ता खंडाते, भिवरी उईके, जयवंती कोरचे, रेखा उईके यांनी संगीता खुरपे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले आहे. तर मायराम मसरकोल्हे, सुखराम कोरचे, मुखचरण उईके, भाऊलाल उईके, सुखराम उईके, जयराम गोंडगे, अरविंद धुर्वे, फुलचंद खुरपे यांच्यासह इतरांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात सारजा उईके आणि संगीता खुरपे यांनी आमरण उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्यांची अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही.