शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मुलांच्या हव्यासापोटी ‘नकुशीं’ची संख्या दोन कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:56 IST

एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.

नवी दिल्ली : एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.सन २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या सातव्या प्रकरणात अशा ‘नकुशा’ मुलींची सैद्धांतिक गणना प्रथमच झाली असून त्यांची संख्या सुमारे दोन कोटी एक लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वेक्षण म्हणते की, कुटुंबात निदान एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे मुलगा होईपर्यंत अपत्ये होऊ दिली जातात. मुलगा होईल या अपेक्षेने घेतलेल्या संधीच्या वेळी झालेल्या मुली ‘नकोशा’ वर्गात मोडतात. त्यामुळे आज मुलींचा जन्मदर पूर्वीपेक्षा वाढलेला दिसत असला तरी त्यातील काही भाग‘नकोशा’ मुलींचा आहे.सर्वेक्षण म्हणते...1970 पासून भारताने लोकसंख्येतील लैंगिक गुणोत्तराचे संतुलन राखण्यात १७ पैकी १० निकषांवर समाधानकारक प्रगती केली असली तरी मुलींपेक्षा मुलांचा अजूनही काहीसा जास्त असलेला जन्मदर ही चिंतेची बाब आहे.1994मध्ये गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायदा केल्यापासून स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण कमी. तरीही समाजात ‘मुलगा हवा’ ही मानसिकता कायम आहे.‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ अशा दोन गटांत वर्गवारीअमर्त्य सेन व इतर अर्थतज्ज्ञांनी मुलगा व मुलगी यांच्या जन्मदराच्या व्यस्त गुणोत्तराचा अभ्यास करून वास्तवात ज्या स्त्रिया जन्माला यायला हव्या वा हयात असायला हव्या होत्या, पण त्या नाहीत अशा ‘गायब स्त्रियां’चा (मिसिंग विमेन) आकडा चार कोटी अंदाजित केला होता.नंतरच्या तीन दशकांत जन्मदरातील मुलींचे गुणोत्तर सुधारले. मुलींची ‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ असा दोन वर्गांत वर्गवारी करण्याचा उपक्रम या वर्षीच्या अहवालात प्रथमच हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जयचंद्रन आणि पांडे या अर्थतज्ज्ञाच्या ताज्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे.अपत्य जन्मात मुलीपेक्षा मुलाला पसंती देण्याचा पगडा ही आहे. यासाठी एरवी वापरण्यात येणारे जन्माच्या वेळचे लैंगिक गुणोत्तर न वापरता कुटुंबातील शेवटच्या अपत्याचे लैंगिक गुणोत्तर हे सूत्र वापरण्यात आले. यावरून केलेल्या विश्लेषणातून दिसते की, साधारणपणे विवाहित दाम्पत्य दोन अपत्यानंतर संततीस पूर्णविराम देत असली तरी, ही ही पहिली दोन अपत्ये मुलगा आहे की मुलगी यावरही संततीविराम अवलंबून असतो.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार