शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

मुलांच्या हव्यासापोटी ‘नकुशीं’ची संख्या दोन कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:56 IST

एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.

नवी दिल्ली : एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.सन २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या सातव्या प्रकरणात अशा ‘नकुशा’ मुलींची सैद्धांतिक गणना प्रथमच झाली असून त्यांची संख्या सुमारे दोन कोटी एक लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वेक्षण म्हणते की, कुटुंबात निदान एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे मुलगा होईपर्यंत अपत्ये होऊ दिली जातात. मुलगा होईल या अपेक्षेने घेतलेल्या संधीच्या वेळी झालेल्या मुली ‘नकोशा’ वर्गात मोडतात. त्यामुळे आज मुलींचा जन्मदर पूर्वीपेक्षा वाढलेला दिसत असला तरी त्यातील काही भाग‘नकोशा’ मुलींचा आहे.सर्वेक्षण म्हणते...1970 पासून भारताने लोकसंख्येतील लैंगिक गुणोत्तराचे संतुलन राखण्यात १७ पैकी १० निकषांवर समाधानकारक प्रगती केली असली तरी मुलींपेक्षा मुलांचा अजूनही काहीसा जास्त असलेला जन्मदर ही चिंतेची बाब आहे.1994मध्ये गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायदा केल्यापासून स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण कमी. तरीही समाजात ‘मुलगा हवा’ ही मानसिकता कायम आहे.‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ अशा दोन गटांत वर्गवारीअमर्त्य सेन व इतर अर्थतज्ज्ञांनी मुलगा व मुलगी यांच्या जन्मदराच्या व्यस्त गुणोत्तराचा अभ्यास करून वास्तवात ज्या स्त्रिया जन्माला यायला हव्या वा हयात असायला हव्या होत्या, पण त्या नाहीत अशा ‘गायब स्त्रियां’चा (मिसिंग विमेन) आकडा चार कोटी अंदाजित केला होता.नंतरच्या तीन दशकांत जन्मदरातील मुलींचे गुणोत्तर सुधारले. मुलींची ‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ असा दोन वर्गांत वर्गवारी करण्याचा उपक्रम या वर्षीच्या अहवालात प्रथमच हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जयचंद्रन आणि पांडे या अर्थतज्ज्ञाच्या ताज्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे.अपत्य जन्मात मुलीपेक्षा मुलाला पसंती देण्याचा पगडा ही आहे. यासाठी एरवी वापरण्यात येणारे जन्माच्या वेळचे लैंगिक गुणोत्तर न वापरता कुटुंबातील शेवटच्या अपत्याचे लैंगिक गुणोत्तर हे सूत्र वापरण्यात आले. यावरून केलेल्या विश्लेषणातून दिसते की, साधारणपणे विवाहित दाम्पत्य दोन अपत्यानंतर संततीस पूर्णविराम देत असली तरी, ही ही पहिली दोन अपत्ये मुलगा आहे की मुलगी यावरही संततीविराम अवलंबून असतो.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार