शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

मुलांच्या हव्यासापोटी ‘नकुशीं’ची संख्या दोन कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:56 IST

एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.

नवी दिल्ली : एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.सन २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या सातव्या प्रकरणात अशा ‘नकुशा’ मुलींची सैद्धांतिक गणना प्रथमच झाली असून त्यांची संख्या सुमारे दोन कोटी एक लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वेक्षण म्हणते की, कुटुंबात निदान एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे मुलगा होईपर्यंत अपत्ये होऊ दिली जातात. मुलगा होईल या अपेक्षेने घेतलेल्या संधीच्या वेळी झालेल्या मुली ‘नकोशा’ वर्गात मोडतात. त्यामुळे आज मुलींचा जन्मदर पूर्वीपेक्षा वाढलेला दिसत असला तरी त्यातील काही भाग‘नकोशा’ मुलींचा आहे.सर्वेक्षण म्हणते...1970 पासून भारताने लोकसंख्येतील लैंगिक गुणोत्तराचे संतुलन राखण्यात १७ पैकी १० निकषांवर समाधानकारक प्रगती केली असली तरी मुलींपेक्षा मुलांचा अजूनही काहीसा जास्त असलेला जन्मदर ही चिंतेची बाब आहे.1994मध्ये गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायदा केल्यापासून स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण कमी. तरीही समाजात ‘मुलगा हवा’ ही मानसिकता कायम आहे.‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ अशा दोन गटांत वर्गवारीअमर्त्य सेन व इतर अर्थतज्ज्ञांनी मुलगा व मुलगी यांच्या जन्मदराच्या व्यस्त गुणोत्तराचा अभ्यास करून वास्तवात ज्या स्त्रिया जन्माला यायला हव्या वा हयात असायला हव्या होत्या, पण त्या नाहीत अशा ‘गायब स्त्रियां’चा (मिसिंग विमेन) आकडा चार कोटी अंदाजित केला होता.नंतरच्या तीन दशकांत जन्मदरातील मुलींचे गुणोत्तर सुधारले. मुलींची ‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ असा दोन वर्गांत वर्गवारी करण्याचा उपक्रम या वर्षीच्या अहवालात प्रथमच हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जयचंद्रन आणि पांडे या अर्थतज्ज्ञाच्या ताज्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे.अपत्य जन्मात मुलीपेक्षा मुलाला पसंती देण्याचा पगडा ही आहे. यासाठी एरवी वापरण्यात येणारे जन्माच्या वेळचे लैंगिक गुणोत्तर न वापरता कुटुंबातील शेवटच्या अपत्याचे लैंगिक गुणोत्तर हे सूत्र वापरण्यात आले. यावरून केलेल्या विश्लेषणातून दिसते की, साधारणपणे विवाहित दाम्पत्य दोन अपत्यानंतर संततीस पूर्णविराम देत असली तरी, ही ही पहिली दोन अपत्ये मुलगा आहे की मुलगी यावरही संततीविराम अवलंबून असतो.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार