शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निधर्मी असणे हा नागरिकाचा मूलभूत अधिकार!

By admin | Updated: September 24, 2014 03:27 IST

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास जसा कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे

मुंबई : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास जसा कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे तसाच कोणताही धर्म न पाळता पूर्णपणे निधर्मी राहण्याचाही अधिकार बहाल केलेला आहे. त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारने कोणालाही कोणत्याही सरकारी फॉर्ममध्ये किंवा जाहीर प्रकटनामध्ये त्याच्या धर्माची नोंद करण्याची सक्ती करू नये, असा पथदर्शक आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.आपण कोणताही धर्म मानत नाही आणि कोणत्याही धर्माचे अनुसरणही करीत नाही, असे म्हणण्याचा प्रत्येक भारतीयास हक्क आहे, असेही न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारी फॉर्म भरताना त्यातील ‘धर्मा’च्या रकान्यात काहीही न लिहिण्याचा अथवा ‘निधर्मी’असे लिहिण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.‘फूल गॉस्पेल चर्च आॅफ गॉड’ नावाची नोंदणीकृत संस्था चालविणाऱ्या डॉ. रणजीत सूर्यकांत मोहिते, किशोर रमाकांत नाझरे आणि सुभाष सूर्यकांत रनावरे यांनी केलेली जनहित याचिका मंजूर करून न्या.अभय ओक व न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या तिघांनी आपण निधर्मी असल्याचे प्रकटन राज्य सरकारच्या राजपत्रात प्रसिद्धीसाठी दिले होते. ते नाकारले गेले म्हणून त्यांनी ही याचिका केली होती. आपण धर्माने ख्रिश्चन असलो तरी आपण ख्रिश्चन धर्म पाळत नाही. फक्त येशु ख्रिस्ताच्या प्रेषित्वावर आपला विश्वास आहे.येशुला पृथ्वीवर परमेश्वरी साम्राज्य आणायचे होते, त्याचे संघटित धर्मात कधीच रुपांतर करायचे नव्हते. बायबलमध्येही ख्रिश्चन धर्माचा कुठे उल्लेख नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये प्रत्येक नागरिकास आपल्या विवेकानुसार जीवन जगण्याचा व कोणत्याही धर्माचे पालन, अनुसरण व प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्याचे सविस्तर विवेचन करीत न्यायालयाने म्हटले की, भारत हे धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असल्याने सरकारचा कोणताही धर्म नाही. (मात्र) आपण कोणत्या धर्माचे पालन करायचे की कोणत्याही धर्माचे पालन करायचे नाही हे ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकास आहे. प्रत्येक नागरिकाने कोणत्या तरी (प्रस्थापित) धर्माचे पालन करायलाच हवे, असा कोणताही कायदा नाही.न्यायालय म्हणते की, राज्यघटनेने दिलेल्या विवेकाच्या स्वातंत्र्यात निधर्मी असण्याचे स्वातंत्र्यही अंतर्भूत आहे. तसेच कोणीही व्यक्ती जन्माने मिळालेल्या धर्माला केव्हाही सोडचिठ्ठी देऊ शकते किंवा एकदा स्वीकारलेला धर्म सोडून दुसऱ्या धर्माचाही स्वीकार करू शकते. त्यामुळे कोणाही व्यक्तीने काय विचार करावा अथवा काय अनुसरावे यावर सरकारचे काहीच नियंत्रण असू शकत नाही.(विशेष प्रतिनिधी)