शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिकेट्स हटविले; शेतकरी रस्त्यावरच; राकेश टिकैत यांनी केंद्राला दिली २६ नोव्हेंबरची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 06:32 IST

 पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील.

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रस्ते अडवू नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिथे जिथे शेतकरी आंदोलन सुरू आहे तिथले बॅरिकेट्स पोलिसांनी हटवले आहेत. परंतु शेतकरी अद्यापही रस्त्यांवर असल्याने वाहतुकीचा प्रश्न कायम आहे.

 पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील. केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. या दिवशी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरद्वारे दिल्लीच्या सीमांवर पोहोचतील आणि तिथे कायमस्वरूपी तंबू बांधतील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. गाझीपूर येथील आंदोलनाच्या जागेजवळील सिमेंट आणि लोखंडी बॅरिकेड्स व काटेरी तारा पोलिसांनी हटवल्यानंतर टिकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. सीमेवरून शेतकऱ्यांना जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न झाल्यास देशभरातील सरकारी कार्यालये मंडईत परिवर्तित झालेली दिसतील. दरम्यान, युनायटेड किसान मोर्चाचे सदस्य आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंग चढुनी यांनीही केंद्रावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास यावेळची दिवाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर करू.

सीमांवर काय आहे स्थिती? गाझीपूर सीमा, टिकरी सीमेवरीला अडथळे पोलिसांनी हटवले आहेत. परंतु रहदारी मात्र नेहमीसारखी एकाच लेनने सुरू आहे. सिंघू सीमा, रेवाडी-मानेसर मार्गावरील आंदोलनस्थळी बॅरिकेट्स जैसे थे आहेत. त्यामुळे या महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांना कासवगतीने पुढे जावे लागते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन