शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 06:33 IST

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ रस्त्यांवर साचलेला बर्फ हटविण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आठ ...

डेहराडून : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ रस्त्यांवर साचलेला बर्फ हटविण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हिमकडा कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) ५७ कामगार दबले गेले. त्यातील ३२ जणांचा जीव वाचविण्यात मदतयंत्रणांना यश आले आहे. अन्य ४१ कामगारांच्या सुटकेसाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिठोरागढ व बागेश्वर जिल्ह्यात २४०० मीटरपेक्षा उंच ठिकाणी हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटना घडण्याचा इशारा चंडीगडमधील डिफेन्स जिओइन्फर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेन्ट या संस्थेने गुरुवारी संध्याकाळी दिला होता. तसेच या जिल्ह्यांतील ३५०० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा इशारा डेहराडून येथील वेधशाळेने दिला. त्यानुसार उत्तराखंडच्या आपत्कालीन यंत्रणेने संबंधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले होते. शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत माणा व बद्रीनाथ यांच्या दरम्यान असलेला बीआरओची एक छावणीदेखील हिमकड्याच्या ढिगाऱ्याखाली दबली असल्याचे चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

३२०० मीटर उंचीवर माणा हे भारत-तिबेट सीमावर्ती क्षेत्रातील अंतिम गाव आहे.

३ किमी अंतर दूर बद्रीनाथपासून.

दुर्घटनेविषयी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी मी चर्चा केली आहे. हिमकडा कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्व कामगारांची सुटका करण्यासाठी मदतपथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

दबलेले कामगार कुठले?हिमकडा कोसळून दबलेल्यांमध्ये झारखंडमधील कामगार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, दुर्घटनास्थळी बीआरओ, आयटीबीपी व अन्य यंत्रणांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

एनडीआरएफ मदतीलाराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) चार मदतपथके रवाना केली आहेत. त्यापैकी दोन पथके डेहराडूनमधील एनडीआरएफच्या क्षेत्रीय प्रतिसाद केंद्रातून (आरआरसी) तर उर्वरित दोन पथके जोशीमठ येथून पाठविण्यात आली. एनडीआरएफचे महासंचालक पीयूष आनंद यांनी सांगितले की, या चार पथकांव्यतिरिक्त आणखी चार पथके सज्ज ठेवली आहेत.

नेपाळमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी चार जखमीकाठमांडू/ पाटणा : नेपाळच्या सिंधुपालचौक जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ६.१ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन त्याचे धक्के काठमांडू तसेच अन्य ठिकाणी जाणवले. त्यामुळे झालेल्या दुर्घटनांत ४ जण जखमी झाले. त्याचवेळी भारतात बिहारमध्ये मुजफ्फरपूर, समस्तीपूर आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ५.५ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. मात्र बिहारमध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळमधील भूकंपाचा केंद्रबिंदू सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंडा येथे होता. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड