शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लग्नाच्या विधी सुरू असताना वारंवार वधूच्या रुममध्ये जात होता नवरदेव; बापानं कानशिलात लगावली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:26 IST

लग्नाच्या दिवशी विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे.

चित्रकूट-

लग्नाच्या दिवशी विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याचं झालं असं की नवरदेव वधूच्या खोलीत वारंवार जात असल्याचं पाहून नाराज झालेल्या वरबापानं आपल्या मुलाच्या कानशिलात लगावली. मग नवरदेवानंही सर्वांसमोर आपल्याच बापावर हात उगारला. या घटनेनं संतापलेल्या वधूनं लग्नास नकार दिला आणि लग्न सोहळा काही होऊ शकला नाही. 

उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील शिवरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. येथील गावातील एका मुलीचा विवाह कानपूरच्या बर्रा येथील रहिवासी असलेल्या तरुणासोबत निश्चित झाला होता. मोठ्या थाटामाटात नवरदेवाची वरात वधूच्या घरी पोहोचली. सारंकाही आनंदात आणि सुरळीत सुरू होतं. पण वरमालाच्या विधीवेळी वधूचं सौंदर्य पाहून नवरदेवाला काही राहावेना. तो वारंवार वधूच्या खोलीत जाऊ लागला. 

खरंतर नवरदेवाला कल्पना होती की त्यांच्या कुटुंबात लग्नाच्या ४-५ दिवसांनंतरच वधूला तिच्या माहेरी पाठवलं जातं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा वधू सासरी येते. पण नवरदेवाला ही गोष्ट काही मान्य नव्हती. तो लग्नाचे विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जात होता. तो वधूला वारंवार समजावण्याचा आणि सासरीच राहण्याची गळ घालत होता. 

नवरदेवाला वडिलांनी लगावली थप्पडलग्नाचे विधी सुरू असताना असं वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाच्या वडिलांना काही रुचलं नाही आणि ते चांगलेच संतापले. त्यांनी भर मंडपात आपल्याच मुलाच्या कानशिलात लगावली. यानंतर नवरदेवालाही राग अनावर झाला आणि आपल्याच वडिलांवर त्यानं हात उगारला. हे पाहून वधूला जबर धक्का बसला आणि तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिनं या कुटुंबाची सून होण्यास नकार दिला. 

वर्षभर माहेरी जाऊ देणार नाहीनवरदेव आपल्या जवळ येऊन वारंवार सांगत होता की लग्नानंतर वर्षभर माहेरी जाऊ देणार नाही. तुला सासरीच राहून शिक्षण पूर्ण करावं लागेल असा तगादा लावत होता, असा आरोप वधूनं केला आहे. नवरदेवाच्या या तगाद्यामुळे आधीच वधू वैतागली होती. त्यात थप्पड मारण्याच्या घटनेनं तिनं लग्नच मोडलं आणि वरात माघारी पाठवली.