शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कृषी कर्जांची थकबाकी वाढल्याने बँका चिंताग्रस्त; राज्य सरकारांनी वसुलीसाठी कायदा करावा- इंडियन बँकिंग असोसिएशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 08:40 IST

३७ हजार काेटी रुपयांहून अधिक कर्जे थकीत असून शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड हाेत नसल्याचा मुद्दा बँकांनी गांभीर्याने घेतला आहे.

अभिलाष खांडेकर -

भाेपाळ : अनेक राज्यांमध्ये काेट्यवधी रुपयांची कृषी कर्जे माफ करण्यात येतात. मतांवर डाेळा ठेवून घेतलेल्या अशा निर्णयांमुळे बँकांचा माेठा फायदा हाेताे; मात्र सध्या कृषी क्षेत्रातील एनपीए वाढत असल्यामुळे देशभरातील बँकांची चिंता वाढली आहे. ३७ हजार काेटी रुपयांहून अधिक कर्जे थकीत असून शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड हाेत नसल्याचा मुद्दा बँकांनी गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारांनी पावले उचलावी, अशी अपेक्षा इंडियन बँकिंग असाेसिएशनने व्यक्त केलीआहे. भारतात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन मध्य प्रदेशात हाेते; मात्र वारंवार कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे मध्य प्रदेशातील शेतकरी कृषी कर्जाची परतफेड करताना दिसत नाही. राज्यस्तरीय बँकिंग समितीने यासंदर्भात एक अंतर्गत गाेपनीय नाेट तयार केली आहे. त्यातून धक्कादायक माहिती ‘लाेकमत’च्या हाती आली आहे. या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे २३ हजार ६८९ काेटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. तर खासगी, सहकारी व ग्रामीण बँका मिळून १३ हजार ७२५ काेटी रुपये, असे एकूण ३७ हजार ४०० काेटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर कर्ज थकीत असल्यामुळे बँकांची चिंता वाढली आहे. बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या थकीत कर्जांच्या वसुलीसाठी मध्य प्रदेश सरकारने नवा कायदा करण्याची मागणी बँकांनी केली आहे. अशा प्रकारे ताेडगा काढण्यासाठी प्रथमच बँकांकडून मुद्दा मांडण्यात येत आहे. मध्य प्रदेश सरकारने याबाबत काेणतीही कठाेर कारवाईचे संकेत दिलेले नाही. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी तयार केली नाेट-     कृषी कर्जांमधील एनपीए हा चिंतेचा मुद्दा असून कर्जमाफीच्या अपेक्षेने शेतकरी कर्जाची परतफेड करत नसल्यामुळे ताे अधिक गंभीर हाेत असल्याचे बँकिंग समितीच्या नाेटमध्ये म्हटले आहे. -     मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्यासाेबतच्या बैठकीमध्ये त्यांना देण्यासाठी ही नाेट बनविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

-     सर्व राज्यांनी आपापल्या राज्यातील वसुली कायदा अधिक सक्षम करावा किंवा गरज भासल्यास नवा कायदा करावा, अशी अपेक्षा इंडियन बँक असाेसिएशनने व्यक्त केली आहे.

टॅग्स :bankबँकagricultureशेती