शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बँका म्हणे, महामार्गांचे हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत

By admin | Updated: May 7, 2017 17:23 IST

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे. नव्या महामार्गांचे जवळपास 30 असे प्रकल्प आहेत की ज्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असूनही काम सुरू होऊ शकले नाही. कारण बँका या प्रकल्पांसाठी कर्जपुरवठा करायला तयार नाहीत. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 31 डिसेंबर 2015 रोजी शिलान्यास करण्यात आलेल्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेचे दोन टप्पे देखील आहेत.कर्जपुरवठा रोखणाऱ्या बँका म्हणतात, आर्थिकदृष्ट्या हे महामार्ग प्रकल्प व्यवहार्य नाहीत, कारण प्रकल्प उभारणाऱ्या खासगी कंपन्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही कर्जाची परतफेड करू शकतील की नाही, याविषयी बँकांना शंका आहे. बँकांच्या दृष्टीने या प्रकल्पांचे (फायनान्शिअल क्लोजर) पुरेसे नाही. साहजिकच नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेटस (एनपीए)च्या ओझ्याखाली अगोदरच दबलेल्या बँका महामार्ग प्रकल्पांना कर्ज पुरवून नवा धोका पत्करायला तयार नाहीत.परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या अधिकाऱ्यांनी 67 महामार्गांच्या बांधणीसंबंधी सद्यस्थितीचे सादरीकरण गडकरींसमोर केले. यापैकी 2243 कि.मी. अंतराच्या 30 प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही बँकांना फायनान्शिअल क्लोजरच्या मुद्याचे समाधान हे प्रकल्प करू न शकल्याने अडकून पडले आहेत. यापैकी बहुतांश महामार्ग हे हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलनुसार बनवण्यात येणार आहेत. महामार्ग बांधणीच्या प्रकल्प उभारणीत सहभागी एका कंपनीच्या अभियंत्याने नाव जाहीर न करण्याच्या शर्तीवर सांगीतले की प्रकल्पांचे फायनान्शिअल क्लोजर न करण्यास मुख्यत्वे बँकांच जबाबदार आहेत. एनपीएच्या भीतीमुळे बँकांचे अधिकारी कर्जपुरवठा करायला तयार नाहीत. त्यांना वाटते की हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही खाजगी कंपन्यांना इतका पैसा मिळणार नाही की बँकांच्या कर्जाची ते परतफेड करू शकतील.बँकांची भीती लक्षात आल्यावर परिवहन मंत्रालयाने एक बैठक आयोजित केली. बैठकीला बँक अधिकारी देखील उपस्थित होते. बँकांना विनंती करण्यात आली की महामार्ग बांधणीत ज्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, त्या कंपन्यांना बँकांनी कर्जपुरवठा केला तर प्रकल्पांचे कामकाज सुरू होऊ शकेल. कर्जाच्या परतफेडीत बँकांना काही अडचणी आल्याच तर केंद्र सरकार बँकांना मदत करील. तथापि या आश्वासनानंतरही बँका कर्जपुरवठयासाठी तयार नाहीत.पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाजत गर्जत दिल्ली मेरठ या महत्वाकांक्षी महामार्गाच्या उभारणीचा शिलान्यास 31 डिसेंबर 2015 रोजी करण्यात आला. या महामार्गाच्या उभारणीचे काम तीन टप्प्यात होणार आहे. तथापि एनएचएआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात 3 पैकी फक्त एकाच टप्प्याचे कामच गेल्या दीड वर्षात सुरू होऊ शकले आहे. देशात 2243 कि.मी. अंतराचे आणखी 29 प्रकल्प बँकांनी कर्जपुरवठ्यास नकार दिल्यामुळे रखडले आहेत.