शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

बँका म्हणे, महामार्गांचे हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत

By admin | Updated: May 7, 2017 17:23 IST

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे. नव्या महामार्गांचे जवळपास 30 असे प्रकल्प आहेत की ज्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असूनही काम सुरू होऊ शकले नाही. कारण बँका या प्रकल्पांसाठी कर्जपुरवठा करायला तयार नाहीत. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 31 डिसेंबर 2015 रोजी शिलान्यास करण्यात आलेल्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेचे दोन टप्पे देखील आहेत.कर्जपुरवठा रोखणाऱ्या बँका म्हणतात, आर्थिकदृष्ट्या हे महामार्ग प्रकल्प व्यवहार्य नाहीत, कारण प्रकल्प उभारणाऱ्या खासगी कंपन्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही कर्जाची परतफेड करू शकतील की नाही, याविषयी बँकांना शंका आहे. बँकांच्या दृष्टीने या प्रकल्पांचे (फायनान्शिअल क्लोजर) पुरेसे नाही. साहजिकच नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेटस (एनपीए)च्या ओझ्याखाली अगोदरच दबलेल्या बँका महामार्ग प्रकल्पांना कर्ज पुरवून नवा धोका पत्करायला तयार नाहीत.परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या अधिकाऱ्यांनी 67 महामार्गांच्या बांधणीसंबंधी सद्यस्थितीचे सादरीकरण गडकरींसमोर केले. यापैकी 2243 कि.मी. अंतराच्या 30 प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही बँकांना फायनान्शिअल क्लोजरच्या मुद्याचे समाधान हे प्रकल्प करू न शकल्याने अडकून पडले आहेत. यापैकी बहुतांश महामार्ग हे हायब्रिड अ‍ॅन्युईटी मॉडेलनुसार बनवण्यात येणार आहेत. महामार्ग बांधणीच्या प्रकल्प उभारणीत सहभागी एका कंपनीच्या अभियंत्याने नाव जाहीर न करण्याच्या शर्तीवर सांगीतले की प्रकल्पांचे फायनान्शिअल क्लोजर न करण्यास मुख्यत्वे बँकांच जबाबदार आहेत. एनपीएच्या भीतीमुळे बँकांचे अधिकारी कर्जपुरवठा करायला तयार नाहीत. त्यांना वाटते की हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही खाजगी कंपन्यांना इतका पैसा मिळणार नाही की बँकांच्या कर्जाची ते परतफेड करू शकतील.बँकांची भीती लक्षात आल्यावर परिवहन मंत्रालयाने एक बैठक आयोजित केली. बैठकीला बँक अधिकारी देखील उपस्थित होते. बँकांना विनंती करण्यात आली की महामार्ग बांधणीत ज्यांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, त्या कंपन्यांना बँकांनी कर्जपुरवठा केला तर प्रकल्पांचे कामकाज सुरू होऊ शकेल. कर्जाच्या परतफेडीत बँकांना काही अडचणी आल्याच तर केंद्र सरकार बँकांना मदत करील. तथापि या आश्वासनानंतरही बँका कर्जपुरवठयासाठी तयार नाहीत.पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाजत गर्जत दिल्ली मेरठ या महत्वाकांक्षी महामार्गाच्या उभारणीचा शिलान्यास 31 डिसेंबर 2015 रोजी करण्यात आला. या महामार्गाच्या उभारणीचे काम तीन टप्प्यात होणार आहे. तथापि एनएचएआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात 3 पैकी फक्त एकाच टप्प्याचे कामच गेल्या दीड वर्षात सुरू होऊ शकले आहे. देशात 2243 कि.मी. अंतराचे आणखी 29 प्रकल्प बँकांनी कर्जपुरवठ्यास नकार दिल्यामुळे रखडले आहेत.