शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बॅड लोन्सबाबत बँका निष्क्रिय!

By admin | Updated: March 18, 2017 02:23 IST

बॅड लोन्सचे प्रमाण वाढत असताना बँका त्यावर कोणतीही कृती करायला तयार नसल्यामुळे बँक्स बोर्ड ब्युरोचे (बीबीबी) अध्यक्ष विनोद राय यांनी वित्त मंत्रालय

नवी दिल्ली : बॅड लोन्सचे प्रमाण वाढत असताना बँका त्यावर कोणतीही कृती करायला तयार नसल्यामुळे बँक्स बोर्ड ब्युरोचे (बीबीबी) अध्यक्ष विनोद राय यांनी वित्त मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयास कडक शब्दात पत्र लिहिले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयात बॅड लोन्सबाबत बैठक झाली होती. राय यांचीही बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर राय यांनी हे पत्र लिहिले आहे, असे सूत्रांनी सांगितले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री अरुण जेटली, वरिष्ठ सरकारी अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि दोन डेप्युटी गव्हर्नर यांनी सरकारी बँकांमधील कुकर्जांचा गेल्या आठवड्यात आढावा घेतला. फेब्रुवारी २0१६मध्ये सरकारने ‘बीबीबी’ची स्थापना केली होती. सरकारी बँका आणि वित्तीय संस्थांच्या वरिष्ठ पातळीवरील पदांवरील नेमणुका करण्यासाठी उमेदवारांच्या शिफारशी करण्याची जबाबदारी बीबीबीवर देण्यात आली होती. त्यानंतर ही जबाबदारी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार बँकांना भांडवल उभारणी आणि व्यवसाय धोरणे विकसित करण्यात मदत करण्यासही संस्थेला सांगण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सरकारी बँकांच्या बॅड लोन्सचा आकडा १ लाख कोटींनी वाढून ६ लाख कोटींवर पोहोचला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)देखरेख समितीला अधिक अधिकार द्याअन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, विनोद राय यांचे पत्र वित्त मंत्रालयाला प्राप्त झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी काय कारवाई केली जाऊ शकते, याची आखणी वित्त मंत्रालयाने केली आहे. देखरेख समितीला अधिक अधिकार देण्याची सूचना करण्यात आली आहे. सखोल पुनर्रचनेसह अन्य उपलब्ध उपायांचा वापर करून निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना द्यायला हवेत, असेही सुचविण्यात आले आहे. या मुद्द्यावर विचार-विनिमय सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी कर्जांच्या पुनर्रचनेचा आढावा घेण्यासाठी देखरेख समितीची स्थापना केली होती.